Health Care Tips  esakal
आरोग्य

Health Care Tips : ‘जेव्हा कडक भूक लागते, तेव्हाच खा’ ; वाचा आहार कसा असावा

आजारातून बरे होण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार महत्त्वाची भूमिका बजावतो

सकाळ वृत्तसेवा

आजारातून बरे होण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने कोरोनासारखा गंभीर आजार होतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चौरस आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे घरी असताना आहार कसा असावा याबाबत आजच्या लेखातून जाणून घेऊ या.

शरीराच्या कष्टाच्या मानाने व प्रकृतीनुसार पुरेसा व समतोल आहार आवश्यक आहे. आहाराचे प्रमाण, प्रकार, वेळा इत्यादींवर आरोग्य अवलंबून असते.पण, आहाराच्या बाबतीत लोक खूप आळशी झालेत. त्यांना तयार पदार्थ खाणे, तिखट मसालेदार पदार्थ जेवणात कमी प्रमाणात असावेत. हॉटेलमध्ये खाणे शक्यतो टाळावे. पचायला साधा हलका ताजा आहार, भूक असेल तेव्हाच जेवणे, थोडी भूक शिल्लक ठेऊन खाणे हे साधे नियम आहेत. कोल्हापूरातील न्युट्रिशनिस्ट डॉ.मृदूल कुंभोजकर यांचे याबाबत काय मत आहे ते जाणून घेऊयात.

न्युट्रिशनिस्टच्या मते, माणसांला अधिक भूक ही फक्त दोनदाच लागते. एक म्हणजे सकाळी आणि दुसरे म्हणजे रात्री. त्यामुळे तूम्हाला जेव्हा जास्त भूक लागली असे वाटते तेव्हाच जेवण करा. जेवणात चायनिज, पिझ्झा बर्गर असे काही न खाता चपाती, पालेभाज्या, डाळी यांचा समावेश करा.

जेवणाची इच्छा नसेल तर, फळे खावीत. त्यांचे ज्युस टाळावा. फळे चावून खाल्ल्याने त्यातील जीवनसत्व अधिक प्रमाणात आपल्याला शरीराला मिळते. तळेलेले पदार्थ कमी खावेत. कधीतरी पापड भजी चालू शकेल पण, नियमित जेवताना पापडाचे सेवन करू नयेत.

मेंदूसाठी उपवास महत्त्वाचा

आठवड्यातून एकदा तरी उपवास करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे शरीराला आराम मिळतो. मग प्रश्न आहे की, उपवासादिवशी आपले कार्य सुरळीत कसे चालू राहते. त्याचे उत्तर असे की, शरीरातील साठवलेले बॉडी फॅट्स हे मेंदूला आणि शरीराला उर्जा देतात. उपवास आणि इतर दिवशी पाणी जास्त प्यावे. उपवासादिवशी दिवसातून 3-4 लिटर पाणी प्यायला हवे.

वजन कशाने वाढते

जेवणात सकस आहार घेणे म्हणजे, पचायला त्रास होणार नाही असे अन्न खाणे. त्यामुळे जेवणात सर्व प्रकारची धान्ये व डाळी खाणे जरुरीचे आहे. तसेच, तूप आपल्या शरीरासाठी आवश्यक पदार्थ आहे. पण, वजन वाढते या भितीने लोक तूप खाणे टाळतात. पण, तूपाने वजन वाढत नाही. तर, तूम्ही रोज खात असलेल्या चपातीमुळे वजन वाढते.

नॉनव्हेज खाणे योग्य?

नॉनव्हेज पदार्थाबद्दल कोणताही गैरसमज नसावा. नॉनव्हेज हे शरीराला अत्यंत चांगल्या दर्जाचे प्रोटीन्स देतात. तर मासे ही मेंदूसाठी चांगले आहेत. दूध आणि पनीर हे शाकाहारी लोकांनी बिन्दास्त खावावे. शाकाहारी लोकांसाठी हा चांगला प्रोटीन सोर्स आहे. तर, सोयाबीननेही चांगले फॅट्स मिळतात.

शरीरासाठी काय घातक ?

डबेबंध पदार्थ, शीतपेय, प्रक्रिया केलेले पदार्थ हे आहारातून वजा करा. वनस्पती तूप, मार्गरीन, ह्याचा वापर टाळा. हे सर्व पदार्थ शरीराला घातक ठरवू शकतं. शेंगदाणे, बदाम, अक्रोड मेंदूला उत्तम. फळे अख्खी खा. त्याचा ज्यूस नको. बटाटा, वांगी, गवार ह्या भांज्यांचं सेवन थोडं कमी प्रमाणात खावे. अधिक प्रथीने आणि स्नीग्ध पदार्थ खा. पण कार्बस कमी खावावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT