Shahajibapu Patil esakal
आरोग्य

Shahajibapu Patil : शहाजी बापूंनी केलेलं डाएट घातक? तज्ज्ञ सांगतात

कमी वेळात एकदम वजन कमी करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shahajibapu Patil Diet Plan : काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, सगळं एकदम ओके म्हणत अचानक प्रसिध्दी झोतात आलेले शाहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांनी चक्क आठ दिवसात ९ किलो वजन कमी केलं. त्यामुळे त्यांनी असं कोणतं डाएट केलं याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.

पहाटे पाच वाजता उठून रोज दोन तास योगासने करायची, यानंतर उकडलेल्या पालेभाज्या, कडधान्ये याचा नाश्ता ते करत. वाफेवर उकडलेल्या पालेभाज्या आणि चपातीचे पौष्टिक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करायचे. दुपारी सुदर्शन क्रिया आणि व्यायाम करायचा, संध्याकाळी मेडिटेशन. असा त्यांचा दिनक्रम होता.

पण तज्ज्ञ म्हणतात असे झटपट वजन कमी करणे हे आरोग्यास घातक ठरू शकतं. याविषयी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आरोग्य तज्ज्ञ डॉ. मयुरा काळे म्हणाल्या, असं क्रॅश डाएट आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

जर तुमचं डाएट फारच असेल तर ते कमी करणं योग्यच असतं. पण ते टप्प्या टप्प्याने करावं. रोज ५०० कॅलरीज कमी करत वजन कमी केलं तर ते ठिक आहे. पण जर रोज ४००० कॅलरीजचे एकदम २००० कॅलरीजवर आणले तर ते घातक ठरू शकतं.

पण क्रॅश डाएटमध्ये खूप कमी खाऊन, नेहमीच्या अगदी निम्मे खाणं करूम कॅलरी इनटेक अगदी कमी करून वजन कमी केलं जातं. याचा विपरीत परिणाम तब्येतीवर होतो. शिवाय डाएट सोडल्यावर किंवा नियमितता न ठेवल्याने पुन्हा वजन वेगात वाढते.

त्यामुळे जर हेल्दी राहून वजन कमी करायचे असेल तर डाएट बरोबरच व्यायम हा महत्वाचा मुद्दा आहे. चालण, पोहणं, धावणं, एरोबिक, लवचिकता टिकवण्यासाठी योगासनं असे व्यायाम प्रकार आवश्यक आहेत. शिवाय जर मसल मास मधलं फॅट कमी करायचं असेल तर वेट ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. मसल्स स्ट्राँग होतात आणि फॅट पण बर्न होतात, असंही डॉ. काळे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

SCROLL FOR NEXT