Weight Loss
Weight Loss google
आरोग्य

Weight Loss : कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त वजन घटवणे पडू शकते महागात

नमिता धुरी

मुंबई : आजच्या काळात कोणीही आपल्या शरीरावर समाधानी नाही. विशेषत: महिलांना नेहमीच परिपूर्ण शरीरयष्टी हवी असते.

तुम्ही अशा अनेक डाएट प्लॅन्सबद्दल ऐकले असेल, जे दहा दिवसांत दहा किलो वजन कमी करण्याविषयी मार्गदर्शन करतात. बरेच लोक विचार न करता हा डाएट प्लॅन फॉलो करायला लागतात. (side effects of quick and extreme weight loss)

कदाचित तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्ही लवकरात लवकर वजन कमी करू इच्छित असाल. पण तुम्हाला माहीत आहे का की पाच दिवसांत पाच किलो किंवा आठवड्यात आठ किलो वजन कमी करणे अजिबात चांगले मानले जात नाही. हेही वाचा - ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

शरीरात पौष्टिकतेची कमतरता

जे लोक जलद वजन कमी करू इच्छितात ते सहसा असा आहार घेण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे त्यांच्या कॅलरीजची संख्या जवळजवळ निम्म्याने कमी होते.

पण असे करताना ते अनेक महत्त्वाच्या पोषक घटकांचे सेवनही सोडून देतात. त्यामुळे शरीरात अशक्तपणा येऊ लागतो. तुम्हाला डोकेदुखी, चक्कर येणे यांसारख्या समस्या असू शकतात.

स्नायू आणि पाणी गमावणे

जे लोक खूप लवकर वजन कमी करतात त्यांना असे वाटते की त्यांच्या शरीरातील चरबी कमी होत आहे. तर प्रत्यक्षात तुम्ही फक्त स्नायू आणि पाणी गमावत आहात.

फॅट बर्न होण्यास वेळ लागतो आणि एकदा का तुम्ही तुमच्या शरीरातील चरबी काढून टाकली की ती लवकर परत येत नाही. स्नायू आणि पाणी हे दोन्ही शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. जेव्हा शरीरातून स्नायू कमी होतात, तेव्हा त्याचा तुमच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.

तसेच, वजन कमी केल्यानंतर तुम्ही स्लिम दिसत नाही. जेव्हा तुम्ही पाणी कमी करता तेव्हा तुमचे शरीराचे निर्जलीकरण होते. तुम्हाला अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, कामात रस कमी होणे अशा अनेक समस्या असू शकतात.

वजन वाढणे

काही लोक खूप लवकर वजन कमी करतात आणि खूप आनंदी असतात. पण प्रत्यक्षात ते तात्पुरते असते आणि गमावलेले वजन लवकर परत मिळते.

वास्तविक, तुमच्या शरीरातून चरबी नसून पाणी कमी झाले होते, जे फार कमी वेळात पुन्हा निर्माण होते. तुम्ही तुमच्या जुन्या आहाराकडे परत जाताच, तुमचे शरीर संरक्षण यंत्रणेत प्रवेश करते.

अशा परिस्थितीत तुम्ही जे काही खाता, त्याचा बराचसा भाग शरीरात साठवून ठेवला जातो, जेणेकरून पुन्हा क्रॅश डाएट झाल्यास ते व्यवस्थित काम करू शकेल.

अशा स्थितीत वजन कमी होण्याऐवजी दुप्पट वेगाने वाढते. म्हणून, नेहमीच सल्ला दिला जातो की तुम्ही एखाद्या चांगल्या आहारतज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच निरोगी पद्धतीने वजन कमी करण्यास सुरुवात करा. एका महिन्यात 3-4 किलोपेक्षा जास्त वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT