health care sakal
आरोग्य

Monsoon Health Care : पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी प्या 'हा' काढा..., जाणून घ्या याचे अनेक फायदे

बदलत्या ऋतूत तुम्हालाही निरोगी राहायचे असेल तर हा काढा रोज सकाळी नक्की प्या.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळा आला आहे आणि संसर्ग आणि रोगांचा धोका जास्त आहे. अशा परिस्थितीत आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काही खास गोष्टींचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. यासाठी बदलत्या ऋतूमध्ये रोज सकाळी काढ्याचे सेवन करावे. यामुळे संसर्गाचा धोका दूर होतो. बदलत्या ऋतूत तुम्हालाही निरोगी राहायचे असेल तर हा काढा रोज सकाळी नक्की प्या.

पावसाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी तुळस आणि ओव्याचा काढा प्या...

तुळशीचा काढा आणि त्याचा चहा गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आजारांपासून बचाव होतो.

आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे सर्दी-खोकला बरा होतो.

तुळशीच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-डिप्रेसंट आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे कफ कमी होऊ शकतो.

हळदीमध्ये अँटी-व्हायरल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मही आढळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि सर्दी आणि खोकल्यापासून संरक्षण होते.

हळद जळजळ कमी करते आणि पावसाळ्यात होणारी अ‍ॅलर्जी देखील दूर करते.

पावसाळ्यात पोटाशी संबंधित समस्या सामान्य असतात. या दूर करण्यात ओवा मदत करू शकतो.

ओव्यामध्ये अँटी-बायोटिक, अँटी-सेप्टिक, अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात. यामुळे पोटदुखी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. याशिवाय पचनक्रियाही सुधारते.

असा तयार करा काढा

लागणारे साहित्य

  • आले

  • तुळशीची पाने - 8-10

  • ओवा - अर्धा टीस्पून

  • हळद - चिमूटभर

  • काळी मिरी - 2

बनवण्याची पद्धत

  • सर्व प्रथम एका कढईत एक ग्लास पाणी टाकून उकळा.

  • आता यामध्ये आले, तुळशीची पानं, काळी मिरी, हळद आणि ओवा टाका.

  • आता ते गाळून घ्या.

  • दिवसातून एकदा हे प्या.

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश! ‘आरटीई’ प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत करता येणार अर्ज, पालकांना घरापासून 5KM अंतरातील निवडता येणार शाळा

Panchang 17 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Gulabrao Patil: केंद्राने निधी अडवल्याने ‘जलजीवन’ला खीळ; मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती, २५ हजार ६१ योजनांची कामे ठप्प!

अग्रलेख : बाहुली बोलकी झाली…

SCROLL FOR NEXT