Raj Kumar Death Anniversary esakal
'जानी' नावाने ओळखल्या जाणाऱ्या राज कुमारचा आवाज आजही आपल्या कानी पडला की त्यांच्या ठाम आवाजाची आणि दमदार अभिनयाची आठवण होते.चित्रपटाला जणू त्यांच्या आवाजाने वजन यायचं.आज राज कुमार यांची पुण्यतिथी.'रंगिली' या चित्रपटातून पदार्पण करणारे राजकुमार त्यांच्या ठाम आवाज आणि अभिनयासाठी ओळखले जायचे.
राज कुमार यांचं कॅन्सरमुळे निधन झालं. पडद्यावर आणि पडद्यामागे त्यांची भूमिका समानच होती असं म्हणायला हरकत नाही.त्यांचा बोलण्याचा अंदाज थेट होता.गोष्टी मनात न ठेवता थेट तोंडावर बोलण्याचा त्यांचा स्वभाव होता.
राजकुमार यांचा जन्म बलूचिस्तानमध्ये झाला होता.त्यांचं जन्मनाव कुलभूषण असं होतं.जे नंतर बदलून त्यांनी राज कुमार करून घेतले. फाळणीनंतर १९४७ पासून राज कुमार त्यांच्या कुटुंबासह मुंबईत राहू लागले.
मुंबईत आल्यावर राज कुमार त्यांची आवडती पोलीस पदाची नोकरी करू लागले.ज्या पोलीस ठाण्यात ते नोकरी करत होते तेथे चित्रपटसृष्टीशी जुळलेल्या अनेक लोकांचं येणं जाणं असायचं.एकदा चित्रपट निर्माता बलदेव दुबे यांच्याशी त्यांची भेट झाली.राजकुमारची बोलण्याची स्टाईल दुबेंना फार आवडली.बलदेव यांनी राज कुमार यांना लगेच चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली.त्यानंतर राजकुमार यांनी नोकरी सोडली.
राज कुमार यांना चित्रपटसृष्टीत खरी ओळख त्यांच्या डायलॉगमुळे मिळाली.आजही त्यांचे डायलॉग ऐकायला लोकांना आवडतात.१९६५ मध्ये आलेल्या 'वक्त' या चित्रपटाचा 'चिनॉय सेठ, जिनके अपने घर शीशे के हों वो दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते', हा डायलॉग फार प्रसिद्ध आहे.राज कुमार यांना चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी त्यांच्या मदर इंडिया या चित्रपटानंतर मिळाली.
ठाम आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या राज कुमार यांना गळ्याचा कॅन्सर झाला.त्यामुळे शेवटच्या दिवसांत त्यांना त्याचा आवाज गमवावा लागला.मरताना त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या अंतिम यात्रेत असावं अशी त्यांची ईच्छा होती.तसे झालेही.त्यांच्या अंतिम संस्कारानंतर चाहत्यांना त्यांच्या निधनाची माहिती दिली गेल्या होती.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.