Death News esakal
जळगाव

Jalgaon News : बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवकॉलनी परिसरातील १७ वर्षीय इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दिशा विठ्ठल नाईक असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. (12th student commits suicide by hanging Jalgaon News)

श्री अपार्टमेंटमध्ये दिशा विठ्ठल नाईक (वय १७) आईसह वास्तव्यास होती. दिशा हिची आई जिल्हा परिषदेत (अनुकंपावर) नोकरीला असून, नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या होत्या. शुक्रवारी (ता. ६) दिशा घरी एकटी असताना, तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सातला आई घरी आल्यावर तिला घरात दिशा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळताच त्यांनी आक्रोश केला.

घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी दिशा नाईक हिला मृत घोषित केले. दिशा जळगाव शहरातील एका महाविद्यालयात बारावीला शिक्षण घेत होती.

दिशाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, तर मोठा भाऊ पुण्यात शिक्षण घेत आहे. याबाबत डॉ. दीपक जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून रामानंदनगर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक अजित पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT