water scarcity  esakal
जळगाव

Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यातील 592 गावांना पाणीटंचाईची झळ; 10 कोटींचा आराखडा तयार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात यंदा केवळ ८८.८ टक्के पाऊस झाला आहे. तब्बल बारा टक्के पाऊस कमी झाला आहे. यामुळे जिल्ह्यात संभाव्य ५९२ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवेल असा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे.

त्यासाठी ९ कोटी ९० लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंजूर केला आहे. लवकरच हा आराखडा शासनाला सादर केला जाईल. २०२३-२४ साठी जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आला. (592 villages in district faces water shortage jalgaon news)

यात जिल्ह्यात आगामी काळात ५९२ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई जाणवणार असल्याची शक्यता असून उपाययोजना राबविण्यासाठी ९ कोटी ९० लाख ७४ हजार रुपयांचा खर्च लागणार आहे. हा आराखडा जिल्हाधिकाऱ्‍यांना सादर करण्यात आला होता. यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.

चाळीसगावात टँकर सुरूच

जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पावसाळा संपूनही पाणीटंचाईची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील १३ गावांमध्ये १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

संभाव्य पाणीटंचाईची गावे

तालुका गावे

जळगाव २१

जामनेर ६९

मुक्ताईनगर २०

पाचोरा २५

अमळनेर १०९

भडगाव १७

भुसावळ ९

बोदवड १२

चाळीसगाव ५७

चोपडा ८७

धरणगाव ३१

एरंडोल २८

पारोळा ८५

रावेर ९

यावल १३

एकूण ५९२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT