Milind Marathe speaking at Marathi literature seminar based on current technology. esakal
जळगाव

Jalgaon News: भविष्यातील साहित्य संमेलनात AI कट्टा! ‘वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्या’वरील परिसंवादात सूर

मिलिंद मराठे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात ‌‘वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : आगामी सात-आठ वर्षांनी होणाऱ्या साहित्य संमेलनात एआय कट्टा (कृत्रिम बुद्धिमत्ता) असेल. त्यात रोबोटिक कवी, कवयित्री सहभागी होतील. भविष्यात सकस साहित्य उत्पन्न करू शकलो तर तंत्रज्ञान उपयोगी ठरेल.

ज्यामुळे सामान्यांचे हित होत असेल, त्यास साहित्य मानावे, असे प्रतिपादन नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी केले. (AI Katta in Future sahitya sammelan demand in seminar on Marathi literature based on current technology Jalgaon News)

ते ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात ‌‘वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. दीपक शिकारपूर (पुणे), नम्रता फलके (नागपूर), मिलिंद कीर्ती (दत्तवाडी), सागर जावडेकर (पणजी-गोवा), संदीप माळी (मुक्ताईनगर) यांनी परिसंवादात सहभाग घेतला.

शिकारपूर म्हणाले, की आयुष्यात ऐटीत जगाचे असेल तर आयटी वापरावे. लवकरच आभासी साहित्य संमेलन होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मेटाव्हर्स हे एक प्रभावी तंत्रज्ञान आहे. लॉकडाउन काळात हे तंत्रज्ञान लोकप्रिय झाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचे सकारात्मक व नकारात्मक पैलू आहेत. तंत्रज्ञानाला शत्रू मानू नका, त्यास स्नेही मानावे, असे मत त्यांनी मांडले.

फलके म्हणाल्या, की ललित साहित्यात जयंत नारळीकर यांनी यंत्रमानव व मानव यांच्या भावविश्वाचे चित्रण केले आहे. आज पुस्तक हार्ड, सॉफ्ट, ऑडिओ, व्हिज्युअल या चार फॉर्मेटमध्ये येते.

ऑनलाइन जाहिरातींच्या माध्यमातून अनेकांनी हजारो पुस्तकांची विक्री केली आहे. डिजिटल मीडिया हे आता मेन स्ट्रीम झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कीर्ती म्हणाले, की पाचवी डिजिटल महासत्ता म्हणून भारताचा उदय होत आहे. मोबाईलचा वापर करणारे लोक हे लेखक बनले आहेत. कोणीही लिहू शकतो, प्रसिद्ध करू शकतो. एआयमुळे यंत्रे बोलू व चालू लागली आहेत.

ही यंत्रे तुमच्यावर पाळत ठेवून आहेत. ऑनलाइन खरेदीत डिस्काउंटच्या माध्यमातून वस्तूंच्या किमती कमी होत आहेत. मानवाची सृजनशीलता कमी होत आहे.

तंत्रज्ञान मोफत मिळत असल्याने त्याची भुरळ पडली. मात्र, एआय अणुबॉम्बपेक्षा अधिक विध्वंसक होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

जावडेकर म्हणाले, की अनेक क्षेत्रांत वेबसाईट निर्माण होत आहे. आयटी क्षेत्र वरदान ठरत असताना त्याचा दुरुपयोग होऊ नये, अशी अपेक्षा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही वरदान नसून, तिचा कमीत कमी वापर करावा. तंत्रज्ञानाचा वापर करा, बुद्धिमत्ता गहाण टाकू नका, असा सल्ला त्यांनी दिला.

माळी म्हणाले, की तंत्रज्ञानामुळे साहित्यात बदल होत आहे. वाचक, लेखक यांची संख्या वाढत आहे. वर्तमानपत्रात आपले साहित्य छापून आणण्याचा विचार मागे पडत आहे.

इंटरनेटवर प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याचा दर्जा त्याला मिळणाऱ्या कमेंट, लाईक, व्ह्यूवरून ठरविला जात आहे. इ-बुक, ऑडिओ बुकद्वारा प्रकाशकांची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. पुस्तक प्रकाशनाचा खर्च नगण्य झाल्याचे मत त्यांनी मांडले. योगेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT