Water News esakal
जळगाव

Amrut Yojna Project : पिंप्राळेकर म्हणताय... ‘अमृतचे पाणी, ठिबक सिंचनावाणी’

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील पिंप्राळा परिसरात अमृत योजनेची नळजोडणी झाल्यानंतर सुरू असलेला पाणीपुरवठा अनेक ठिकाणी कमी दाबाने होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून, रस्त्यांची दुर्दशा झाल्याने अनेक वर्षे त्याचा त्रास सहन करून अमृत योजना मार्गी लागली असली, तरी ती कार्यान्वित झालेली नाही.

काही ठिकाणी चाचणी सुरू असून, त्यातच मोठ्या प्रमाणात त्रुटी समोर येत असून, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याने टंचाई निर्माण झाली आहे. (Amrit Yojna Supply Water under low pressure Citizens angry due to artificial scarcity Jalgaon News)

या भागात समस्या तीव्र

पिंप्राळा परिसरातील मुक्ताईनगर, बीएसएनएल टॉवर परिसर, आसाराम बापू आश्रमासमोरील परिसर, आर. एल. हॉस्पिटल परिसर, सावखेडा रोड परिसर, गणपतीनगर, माधवनगर, सुख अमृतनगर, साई कल्पना रेसीडेंन्सी, सोनीनगर, ओंकार पार्क, जाखेटेनगर परिसरात अमृत योजनेची जोडणी करण्यात आली आहे.

मात्र, कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी मिळत नसल्याची ओरड अनेक नागरिकांकडून होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून त्याकडे दुलर्क्ष केले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

जलवाहिनी जोडली, पण...

पिंप्राळा परिसरात असलेल्या साई कल्पना रेसिडेन्सीत शनिवारी (ता. १०) पाईपलाईन फुटली होती. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जोडणी केली. मात्र, त्यानंतरही अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

पाण्यासाठी अक्षरश: भटकंती

कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी अक्षरश: भटकंती करावी लागत आहे.

अमृत योजनेमुळे नागरिकांना २४ तास पाणी मिळेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, या ठिकाणी एक तासही पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

जुनीच योजना चांगली

महापालिकेच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेतून चांगले पाणी येत होते. पूर्ण दाबाने होत असलेल्या पुरवठ्यामुळे दुसऱ्या मजल्यावरही मोटरशिवाय पाणीपुरवठा होत होता.

आता तर मोटर लावूनही पाणीपुरवठा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या नवीन योजनेत नेमक्या काय त्रुटी आहे, याची पाहणी करावी व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काय म्हणतात नागरिक...

पाणीटंचाईमुळे त्रस्त

"अमृत’ योजनेची जोडणी केल्यामुळे अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत."

-पद्माकर खैरनार

...तर हंडा मोर्चा आणणार

"पाणीटंचाईबाबत आम्ही अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे. मात्र, ते दुर्लक्ष करीत आहेत. तातडीने या समस्येकडे लक्ष दिले नाही, तर आम्ही महापालिकेवर हंडा मोर्चा काढू."

-समाधान चांदेकर

‘अमृत’नको जुनीच योजना चांगली

"अमृत योजनेमुळे २४ तास पाणी मिळेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी एक तासही पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे जुनीच योजना चांगली होती, असे वाटू लागले आहे."

-मनोज गुंजाळ

योजनेतील त्रुटी दूर करा

"अमृत योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्याच्या जोडणीत काही त्रुटी असल्यास त्याची पाहणी करून पाणीपुरवठा पूर्ण दाबाने करावा."

-प्रा. अतुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT