Babusinghji Maharaj esakal
जळगाव

Jalgaon News | सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार : पू. बाबूसिंगजी महाराज

सकाळ वृत्तसेवा

जामनेर (जि. जळगाव) : आठ राज्यात ११ हजार तांड्यावर प्रत्यक्ष संपर्क करून ३ हजार तांड्यावर ख्रिस्ती मिशनरीकडून बंजारा बांधवांचे धर्मांतर झाले आहे. (Babusing Maharaj statement Hindu religion at All India Gor Banjara Labana Naikada Samaj Kumbha godri Jalgaon news)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

त्या सर्व बांधवांना पुन्हा सनातन हिंदू धर्मात परत आणणार आहोत, असा निर्धार पू. संत बाबूसिंगजी महाराज यांनी आज येथे व्यक्त केला. अखिल भारतीय गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभाच्या गोद्री येथील धर्मसभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते

या कुंभास बुधवारपासून (ता.२५) सुरवात झाली. व्यासपीठावर पोहरागडचे मुख्य गादीपती पू. संत बाबूसिंग महाराज, अ.भा. धर्म जागरण प्रमुख शरद ढोले, पू. महामंडलेश्वर गुरू शरणानंद महाराज, पू. संत गोपाल चैतन्य महाराज, संत सुरेश महाराज, संत देनाभगतजी महाराज, संत यशवंत महाराज, संत जितेंद्रनाथ महाराज, आचार्य साहेबराव शास्त्री, महंत संग्रामसिंग महाराज, संत रायसिंग महाराज आदी संत उपस्थित होते.

हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज जागृत करण्यासाठी व समाजाला दिशा देण्यासाठी कुंभ आयोजित असल्याचे पू. संत बाबूसिंगजी महाराज यांनी सांगितले.

यावेळी मंचावर असलेल्या बालाजी भगवान, गुरुनानक देवजी साहेब, भारत माता आणि संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली.

गोद्री समाज कुंभात धर्मसभेसाठी उपस्थित संत- महंत.

पूर्वांचलातील चार राज्यांचे ख्रिस्तीकरण : ढोले

अ.भा. धर्मजागरण चे प्रमुख शरदराव ढोले यांनी मार्गदर्शन करताना देशाचे वैभव पाहून परकीय आक्रमणे झाली. ज्या ग्रीकांनी आक्रमण केले होते ते हिंदू झाले. इस्लामचे आक्रमण वेगळे होते. ते क्रूर होते तलवारीच्या जोरावर लाखो लोकांचे धर्मांतरण त्यांनी केले. इसाई द्वारा छल, कपट आणि सेवेच्या माध्यमातून धर्मांतरण सुरु झाले.

हे धर्मांतरण पूजा पद्धती पुरते मर्यादित न राहता वेगळे राज्य आणि वेगळा देशाच्या मागणीने सुरु झाले. पूर्वांचल मध्ये ७ पैकी ४ राज्यांमध्ये ख्रिस्तीकरण झाले. ११ हजार बंजारा तांड्यापैकी ३ हजार तांड्यांचे धर्मांतरण झाले आहे. बंजारा समाजाचे धर्मांतरण होऊ नये यासाठी तसेच धर्मांतरण थांबविण्यासाठी शेकडो संत येथे आले असल्याचे त्यांनी सांगितले.

संत गोपाळ चैतन्य महाराज यांनी आपल्या आशीर्वचन करताना संत समाज धर्म रक्षणाचे काम करतो. ३ हजार गावात धर्म परिवर्तन झाले आहे म्हणून कुंभाची गरज पडल्याचे ते म्हणाले. संत सुरेश महाराज, पू. महामंडलेश्वर शरणानंद महाराज यांनीही सभेस संबोधित केले.

गोद्री बंजारा समाज कुंभात पारंपरिक वेशात लोकनृत्य सादर करताना महिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT