Vegetable  esakal
जळगाव

Jalgaon News: भेंडीसह भाजीपाल्यामुळे शेकडो तरुणांना रोजगार; दररोज 70 लाखांची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हिरवा भाजीपाला खरेदी केंद्रांमुळे स्थानिक शेकडो तरुणांना रोजागार मिळाला आहे. भाजीपाल्याच्या रोज होणाऱ्या खरेदी-विक्रीमुळे शहराची ओळख देशासह परदेशातही झाली असून, यातून तालुक्याच्या अर्थकारणाला काहीसी गती मिळाली आहे.

आत्मविश्वास, जिद्द आणि प्रामाणिकपणा असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करता येते, हे भाजीपाला खरेदी केंद्र सुरू करणाऱ्या तरुणांनी दाखवून दिले आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना रोख पैसा मिळत असल्यामुळे एरंडोल, धरणगाव, भडगाव तालुक्यांत भाजीपाला लागवडीत मोठी वाढ झाली आहे.

येथील राष्ट्रीय महामार्गालगत सुमारे दहा ते १५ भाजीपाला खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. तेथे रोज एरंडोल, धरणगाव व भडगाव तालुक्यांतील शेतकरी भेंडी, वांगे, गवार, कारले, चवळीच्या शेंगा, काकडी, गोलभेंडी (ढेमसे), हिरवी मिरची, ढोबळी मिरची, लाल टमाटे, वाटाण्याच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा विक्रीसाठी आणतात.

भाजीपाल्यास देशभरातून मागणी असल्यामुळे वाहतूकदारांनाही रोजगार मिळाला आहे. शहरातून रोज सुमारे ५० ते ६० टन हिरवा भाजीपाला दहा ते १५ वाहनांतून वाशी, कल्याण, मुंबईला पाठविला जातो.

भाजीपाला खरेदी केंद्राच्या माध्यमातून रोज सुमारे ६० ते ७० लाखांची आर्थिक उलाढाल होते. वाशी, कल्याण येथील व्यापाऱ्यांकडून भेंडी, कारले व गवार यांची अन्य राज्यांतही विक्री केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणारे प्रवासीही थांबून भाजीपाल्याची खरेदी करतात.

राष्ट्रीय महामार्गालगत सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी तरुणांनी भाजीपाला खरेदी केंद्रे सुरू करून वाशी व कल्याण येथे पाठविण्यास सुरवात केली. प्रारंभी अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, तरुणांनी हिंमत न हारता आत्मविश्वासाने व्यवसाय सुरूच ठेवला. नंतर शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे व्यवसायाची व्याप्ती वाढली.

आता तर या व्यवसायाने उत्तुंग भरारी घेतली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे, तसेच कमी जास्त होणाऱ्या पावसामुळे पारंपरिक घेतल्या जाणाऱ्या पिकांचे दरवर्षी नुकसान होते. नुकसानीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड करण्यास सुरवात केली आहे. यामुळे शेतमजुरांनाही रोजगार मिळाला आहे.

भाजीपाल्याला रोज चांगला भाव मिळेल, याची खात्री नसल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांकडून भाजीपाला रस्त्यावर फेकला जातो. वाहतुकीत अडचण आल्यास भाजीपाला खराब होऊन व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. अशाही परिस्थितीत येथील व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला आहे.

चांगल्या उत्पादनामुळे शेतकरी कृषी केंद्रांवर जाऊन भाजीपाल्याच्या नवीन जातींची लागवड करीत असतात. ग्रामीण भागात भाजीपाला लागवडीत मोठी वाढ झाल्याने आगामी काळात खरेदी केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

भेंडीची सर्वाधिक निर्यात

तालुक्यात पाण्याची सोय असलेले शेतकरी भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. तालुक्यात बाराही महिने भेंडीची लागवड होत असून, येथून भेंडीची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. साधारणतः खरेदीदार बाजारभावाने दराने भेंडीची खरेदी करतात. दुपारी बारापासून भेंडी खरेदीला सुरवात होते.

दिवसभरात साधारणतः शंभर क्विंटलची भेंडी खरेदी होते. मालाची मोजणी करून शेतकऱ्यांना रोख रक्कम तत्काळ अदा केली जाते. मालाची प्रतवारी करून योग्य पॅकिंग केल्यानंतर येथील खरेदीदार रात्री अकराच्या सुमारास भेंडी वाशी, कल्याण, मुंबई मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT