sakal
जळगाव

कन्नड घाटातील कामाला वनविभागाचा हिरवा कंदील

दुरुस्ती युद्धपातळीवर : १५ दिवसांनंतर अवजड वाहतूक होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : मुसळधार पाऊस अन्‌ त्यातच दरड कोसळण्याने खराब झालेला कन्नड घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यास वन विभागाने काही अटी- शर्तींवर मान्यता दिली आहे. त्यामुळे घाटातील मजबुतीकरणाच्या कामाला गती मिळाली असून, हे काम आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

संभाव्य धोका लक्षात घेता, सध्या अवजड वाहनांची घाटातून होणारी वाहतूक बंद आहे. मात्र, संपूर्ण दुरुस्ती झाल्यानंतर साधारणतः १५ ते २० दिवसांनी अवजड वाहनांसाठीही घाटातून वाहतूक पूर्ववत सुरू होईल, असा विश्‍वास राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी व्यक्त केला.

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील कन्नड घाटात अतिवृष्टीमुळे जवळपास नऊ ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दगडांसह मलबा आल्याने वाहतूक बंद झाली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागासह वाहतूक शाखेच्या पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरवातीला रस्त्यावरील मलबा, माती दूर करून एका बाजूने वाहतूक सुरू केली.

हा घाट वन विभागाच्या गौताळा अभयारण्यात येत असल्याने, घाटातील रस्त्याची दुरुस्ती करायची म्हटली, तरी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. घाटातील रस्त्यावर जमलेला चिखल, दगड, माती बाजूला सारल्यानंतर लहान व चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला झाला, तरी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद आहे. जोपर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण होत नाही, तोपर्यंत ही वाहतूक सुरू करता येणे शक्य नव्हते. त्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक होती.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने वन विभागाकडे परवानगी मागितल्यानंतर २० सप्टेंबरला घाटातील रस्त्याचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण करण्याच्या कामाला वन विभागाने हिरवा कंदील दाखविला. मात्र, हे काम करीत असताना, काही अटी व शर्ती वन विभागाने ठेवल्या आहेत. ज्यात एकही झाड तोडता येणार नाही, आठ किलोमीटरच्या घाटातील रस्त्याची रुंदी सात ते दहा मीटर असून, ती आहे तशीच ठेवावी लागणार आहे. त्यानुसार, रस्ता दुरुस्तीला युद्धपातळीवर सुरवात झाली असून, वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

"वन विभागाने दिलेल्या परवानगीमुळे आम्ही युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. घाटात अजूनही दरड कोसळण्याची शक्यता असल्याने वाहनधारकांनी पुरेशी काळजी घ्यावी. अवजड वाहनांसाठी तूर्त रस्ता झालेला नाही. साधारणतः १५, २० दिवसानंतर काम पूर्ण झाले, की अवजड वाहनांची वाहतूक सुरू होईल. -अरविंद काळे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, औरंगाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT