Gulabrao Patil esakal
जळगाव

Gulabrao Patil News : नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञानस्नेही उपक्रम राबवा : पालकमंत्री पाटील

सकाळ वृत्तसेवा

Gulabrao Patil News : प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्यासाठी, सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ राबविले जात आहे.

(gulabrao Patil statement about Implement innovative technology friendly activities jalgaon news)

प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञान स्नेही उपक्रम राबवून अभियान यशस्वी करावे. अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.२३) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एम राजकुमार, जळगाव वन उपसंरक्षक प्रवीण ए, मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, की राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा जिल्ह्यात २० ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेत ३१ ऑक्टोबरच्या आत pragatiabhiyan.maharashtra.gov.in या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करून सर्व शासकीय विभागांनी अभियानात सहभाग नोंदवावा. जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील स्पर्धेचे अर्ज विहित कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT