Transport esakal
जळगाव

शेतकऱ्यांच्या नावाने चांगभलं; नदीपात्रातील गाळ थेट वीटभट्ट्यांवर

जेसीबी व डंपर मालक दररोज शेतकऱ्यांच्या नावाखाली हजारो ब्रास (माती) गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करून वरणगाव येथील विटभट्ट्यांवर साठा करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

वरणगाव (जि. जळगाव) : हतनूर धरण प्रकल्पांतर्गत मुक्ताईनगर शहरातील तापी व पूर्णा या नद्यांच्या काठावरील गाळाचा उपसा करून शेतकऱ्यांच्या नावाखाली शेकडो ब्रास (माती) गौण खनिजाचे कोणताही कर न भरता सर्रास उत्खनन सुरू आहे. जेसीबी मशिनच्या सहाय्याने उत्खनन करून डंपरमधून अवैध वाहतूक करून वरणगाव येथे साठा आणि वापर करणाऱ्या वीटभट्टी मालकांची पाठराखण करणाऱ्या साठेबाजांवर दंडात्मक कारवाईची मागणी वारंवार होत असताना त्यांना मुक्ताईनगर व भुसावळ तालुका महसुली प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा धरणांत पाणीसाठा मुबलक आहे. त्यामुळे गाळ काढणे शक्य होत नाही. हतनूर जलप्रकल्पांतर्गत मुक्ताईनगर येथील तापी व पूर्णा नद्यांमधील पाणी साठा कमी झाल्यामुळे वरणगाव व मुक्ताईनगरमधील जेसीबी व डंपर मालक दररोज शेतकऱ्यांच्या नावाखाली हजारो ब्रास (माती) गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करून वरणगाव येथील विटभट्ट्यांवर साठा करीत आहेत. त्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी मुक्ताईनगर व भुसावळ, तहसीलदार मुक्ताईनगर व भुसावळ यांनी संबंधितांवर दंडात्मक कारवाईची मागणी नागरिकांनी अनेकदा केलेली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील (माती) व गौण खनिजाचे उत्खनन केल्यानंतर आता या बेकायदेशीर वरणगावमधील वीटभट्टी मालकांनी गाळ उपशाच्या नावाखाली गौणखनिजाचा वापर शेतीमध्ये माती टाकत असल्याच्या नावाने उत्खनन, वाहतूक वापर आणि साठा मागील अनेक वर्षांपासून करून कोट्यवधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडविला असल्याची चर्चा आहे. तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित वीटभट्ट्यांवरील (मातीची) गौण खनिजाचे मोजमाप करण्याची मागणी केली होती. त्यावर दंडात्मक कारवाई करण्याची लेखी मागणी अनेकदा करूनही प्रशासनाकडून सतत या लेखी निवेदनाकडे डोळेझाक करून वीटभट्टी मालकांना मूक संमती आणि प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

लाखो रुपये कोणाच्या खिशात

अवैध उत्खनन करून गौण खनिजाचे स्वामित्वधन सरकारजमा न करता महसूल विभागाचे काही कर्मचारी मालामाल झाले आहेत. गौणखनिज माफियांनी हे प्रशासन पाळले की काय, असा संशय व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबीची गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे.

''वरिष्ठांच्या आदेशाने ३ ते ४ वीटभट्टयांचे मालकांना १० ते १२ लाख रुपये दंडाच्या नोटिसा देऊन कारवाई केल्या आहेत. पुढे ही प्रत्येक वीटभट्टीवर जाऊन मातीचे मोजमाप करून दंडात्मक कारवाया करणार आहे. मात्र राजकारण्यांचा हस्तक्षेप असल्याने अडचणी निर्माण होत आहे.'' - योगिता पाटील, मंडळ अधिकारी, वरणगाव विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT