cotton crop 
जळगाव

कपाशीच्या पीकविम्यात पीक कापणीचा अडसर

साधारण जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा पेरणी (लागवड) कालावधी असतो.

सकाळ डिजिटल टीम

पातोंडा (ता. अमळनेर) : पातोंडा व अमळगाव मंडळासह तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने विमा कंपनीने तत्काळ २५ टक्के विमा मंजूर करा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र पीक कापणी कालावधीनंतरच विमा रक्कम देता येईल, असे जिल्ह्याच्या पीकविमा कंपनीने स्पष्ट केले आहे. इतर पिकांसाठी मात्र शासनाकडून आदेश आल्यास २५ टक्के रक्कम त्वरित दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पीकविम्यासाठी आता शासनाच्या आदेशाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पीक कापणी कालावधी महत्त्वाचा
शासनाच्या धोरणानुसार खरिपातील पिकांसाठी कृषी मंडळात रोटेशन पद्धतीने दर वर्षी कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांकडे पीक कापणी तक्ते दिले जातात. साधारण जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा पेरणी (लागवड) कालावधी असतो. खरिपातील मूग, उडीद व सोयाबीन या पिकांचा कापणी कालावधी २५ ते ३० ऑगस्टदरम्यान असतो. कापूस पिकाचा कापणी कालावधी १० नोव्हेंबर ते २० डिसेंबर हा असतो. कृषी विभागाचा कापणी प्रयोग तक्ता पूर्ण झाल्याशिवाय कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले हे समजत नाही.

दुसरा टप्पा कापणीनंतर द्यावा
खरिपातील मूग, उडीद या पिकांचा कापणी कालावधी २५ ते ३० ऑगस्टदरम्यान असल्याने या पिकांचा पीकविमा लवकर मंजूर होण्यासाठी पीक कापणी कालावधी अडसर ठरण्याची होण्याची शक्यता आहे. मूग, उडीद व कापूस यासह सर्वच पिकांना तत्काळ २५ टक्के विमा मंजूर करावा व दुसरा टप्पा पीक कापणी कालावधीनंतर होणाऱ्या पिकांच्या नुकसानावर आधारित उर्वरित विमा रक्कम मंजूर करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

मंडळनिहाय नुकसानीची सरासरी ठरवणे ही शासनाची अट चुकीची आहे. त्यामुळे ठराविक शिवारातील पिकांचे नुकसान होत असल्यास शेतकरी विमा लाभापासून वंचित राहतो म्हणून पीकविमा संरक्षण हे गावनिहाय नुकसानावर ठरवावे, अशी चर्चा होताना दिसून येत आहे.
-दिलीप बोरसे, युवा शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य, पातोंडा

अमळनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या समितीची बैठक होऊन लवकरच शासनास अहवाल पाठविला जाईल. शासनाकडून ज्या पिकांचा विमा मंजूर होईल, त्यांची तीस दिवसांच्या आत शेतकऱ्यांना २५ टक्के मंजूर रक्कम अदा केली जाईल. कपाशीबाबत पीक कापणी कालावधीच्या दहा दिवस आधी पाहणी करून निर्णय घेण्यात येईल. नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती भारती अॅक्सा विमा कंपनीच्या १८००-१०३-७७१२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा भारती अॅक्सा कंपनीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर रामोशी, तालुका कृषी कार्यालय अमळनेर येथे प्रत्यक्ष लेखी स्वरूपात देऊ शकतात.
-प्रभासचंद्र, भारती अॅक्सा, जिल्हा व्यवस्थापक, जळगाव

मंडळनिहाय नुकसानीची सरासरी ठरवणे ही शासनाची अट चुकीची आहे. त्यामुळे ठराविक शिवारातील पिकांचे नुकसान होत असल्यास शेतकरी विमालाभापासून वंचित राहतो म्हणून पीकविमा संरक्षण हे गावनिहाय नुकसानावर ठरवावे, अशी चर्चा होताना दिसून येत आहे.
-दिलीप बोरसे, युवा शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य, पातोंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT