जळगाव

अमळनेर तालुक्यातील गावांमध्ये शेतशिवार तुडुंब

पर्जन्यमान व शासनाच्या नियमानुसार ६५ मिलिमीटरपेक्षा पाऊस जास्त असला, तर शेतीतील पिकांचे पंचनामे करता येतात.

सकाळ वृत्तसेवा


अमळनेर : तालुक्यात काही दिवसांपासून पावसाची संततधार (Heavy Rain) सुरू असून, ओल्या दुःष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पातोंडा, मठगव्हाण, रुंधाटी, नालखेडा, गंगापुरी, खापरखेडा शिवारात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेत तुडुंब भरली आहेत. शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी (Farmers) चिंताग्रस्त झाले आहेत. या शिवाराची आमदार अनिल पाटील (MLA Anil Patil) यांनी पाहणी केली.

अनेक वर्षांपासून पर्जन्यमान कमी असले, तरी या भागातील शेतजमीन पावसामुळे पूर्ण पाण्याने भरून जाते. गेल्या वर्षी आमदारांनी या भागातील शेतजमिनींचा सर्व्हे करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व यंत्रणाही सोबत होती. या भागातील सर्व्हे करून पातोंडा व सावखेड्याच्या नाल्यांमध्ये हे पाणी कसे वळवता येईल, तसेच त्या ठिकाणी असलेल्या दोन पाटचाऱ्यांचे सिंचन विभागाच्या माध्यमातून खोलीकरण करता येईल व रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारींच्या माध्यमातून शेतातील पाणी बाहेर काढता येईल, याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा झाली होती.


पर्जन्यमान व शासनाच्या नियमानुसार ६५ मिलिमीटरपेक्षा पाऊस जास्त असला, तर शेतीतील पिकांचे पंचनामे करता येतात. मात्र, या भागात पर्जन्यमान कमी असले, तरी पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहते व पिकांचे नुकसान होते. यामुळे या भागाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या शेतजमिनींचा पंचनामा करावा, तसा प्रस्ताव व निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल. भविष्यात या भागातील शेतजमिनीतील पाण्याचा निचरा कसा होईल व लोकांना न्याय कसा मिळेल, याचा विचार करून संबंधित विभागातील यंत्रणेशी संपर्क झाला आहे. लवकरात लवकर या भागाचे सर्वेक्षण होऊन व संबंधित विभागांची बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल, असे आमदारांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. या वेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT