cottan crop cottan crop
जळगाव

कपाशीवरील पांढऱ्या डागांची शेतकऱ्यांत धास्ती

Jalgaon Farmer News: जिल्ह्यात पाऊस नगण्य असूनही पुन्हा ही भीती निर्माण झाल्याने कापूस उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

बालकृष्ण पाटील

गणपूर(ता चोपडा): जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात 22 व 23 जुलै ला पडलेल्या पावसाच्या (Rain) शिडकाव्यानंतर कपाशीच्या (Cotton) पिकावर दिसलेल्या पांढऱ्या थर (white spots) व आवरनामुळे शेतकरी (Farmer) वर्गात धास्तीचे वातावरण पसरले असून त्यासाठी घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

(farmers were frightened by the white spots on cotton bms86)

जिल्ह्यात पाऊस नगण्य असूनही पुन्हा ही भीती निर्माण झाल्याने कापूस उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.काही तासात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शेतकरी धास्तावले असून काहींनी त्यासाठी फवारणीची तयारीही सुरू केली आहे.दरवर्षी एखाद्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होण्याचे दरवर्षाचे अनुभव आहेत.

पोलुशन व काही अंशी पावसाच्या पाण्यात सोडियमयुक्त प्रमाणामुळे असे घडते. पाऊस आल्यावर ते धुतले जाईल. त्यासाठी घाबरण्याचे कारण नाही.

- पी.व्ही.देसाई , तालुका कृषी अधिकारी,चोपडा

खाऱ्या पाण्याच्या पावसामुळे असे घडते.मोठ्या पावसात धुतले जाइल. बर्निंग प्रॉब्लेममुळे शिरेच्या टोकाला एखादे छिद्र पडू शकते.नुकसान होणार नाही.गांडूळ पाणी फवारल्यास तीव्रता कमी होईल.

- महेश महाजन ,शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र ,पाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT