जळगाव

राज्यात २१३ लाख टन उसाचे गाळप; खानदेशात प्रारंभ

बालकृष्ण पाटील

गणपूर (ता. चोपडा) : राज्यात या वर्षी आतापर्यंत १६५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून, २१२.७३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तसेच १८७.०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात आतापर्यंतच्या साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग अव्वल असून, तेथे १०.१६ इतका साखर उतारा निघाला आहे. 

राज्यात आतापर्यंत ८६ सहकारी आणि ७९ खासगी साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, २०० पेक्षा जास्त कारखान्यांनी या वर्षी गाळपासाठी परवानगी मागितली होती. कोल्हापूर विभागातील ३६, पुण्यातील २७, तर सोलापूर विभागातील ३५ साखर कारखाने सुरू झाले आहेत. नगर विभागात २५, औरंगाबादमधील २०, नांदेडमधील २०, अमरावतीमधील दोन कारखाने सुरू झाले असून, नागपूर विभागातील एकाही कारखान्याचे गाळप सुरू झालेले नाही.

आजच्या घडीला राज्यात दररोज सहा लाख ४० हजार टन उसाचे गाळप सुरू आहे. राज्यात सर्वाधिक कमी साखर उतारा अमरावती विभागाचा असून, तो ७.३४ इतका आहे. खानदेशात बहुतेक साखर कारखाने बंद असून, शहादा येथील सातपुडा तापी सहकारी साखर कारखाना, डोकारे (नवापूर)येथील आदिवासी आणि आयन कारखाने सुरू असून, त्यांचे गाळप अजूनही कमी आहे, तर शिरपूरमधील दत्तप्रभू ॲग्रो, जळगावमधील मुक्ताई शुगरमध्येही उसाचे गाळप सुरू झाले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT