जळगाव

राज्यात २१३ लाख टन उसाचे गाळप; खानदेशात प्रारंभ

बालकृष्ण पाटील

गणपूर (ता. चोपडा) : राज्यात या वर्षी आतापर्यंत १६५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून, २१२.७३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तसेच १८७.०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात आतापर्यंतच्या साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग अव्वल असून, तेथे १०.१६ इतका साखर उतारा निघाला आहे. 

राज्यात आतापर्यंत ८६ सहकारी आणि ७९ खासगी साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, २०० पेक्षा जास्त कारखान्यांनी या वर्षी गाळपासाठी परवानगी मागितली होती. कोल्हापूर विभागातील ३६, पुण्यातील २७, तर सोलापूर विभागातील ३५ साखर कारखाने सुरू झाले आहेत. नगर विभागात २५, औरंगाबादमधील २०, नांदेडमधील २०, अमरावतीमधील दोन कारखाने सुरू झाले असून, नागपूर विभागातील एकाही कारखान्याचे गाळप सुरू झालेले नाही.

आजच्या घडीला राज्यात दररोज सहा लाख ४० हजार टन उसाचे गाळप सुरू आहे. राज्यात सर्वाधिक कमी साखर उतारा अमरावती विभागाचा असून, तो ७.३४ इतका आहे. खानदेशात बहुतेक साखर कारखाने बंद असून, शहादा येथील सातपुडा तापी सहकारी साखर कारखाना, डोकारे (नवापूर)येथील आदिवासी आणि आयन कारखाने सुरू असून, त्यांचे गाळप अजूनही कमी आहे, तर शिरपूरमधील दत्तप्रभू ॲग्रो, जळगावमधील मुक्ताई शुगरमध्येही उसाचे गाळप सुरू झाले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT