compensation farmer
compensation farmer 
जळगाव

शेतकऱ्यांना २८७ कोटींची नुकसान भरपाई 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत २०१९-२० मध्ये जिल्ह्यातील ४२ हजार १७९ शेतकऱ्यांनी सहभागी होऊन स्वत:चा एकूण ३५ कोटी ७२ हजारांचा विमाहप्ता ॲग्रिकल्चर इन्शुरन्स ऑफ इंडिया या विमा कंपनीमार्फत भरला होता. त्यांपैकी ४१ हजार ३७९ शेतकऱ्यांना ५४ हजार १२४ हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित रक्कम २८७ कोटी ५९ लाख मंजूर झाले आहेत. 
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खरीप हंगाम चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान व कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी संबंधित विमा कंपनी व कृषी विभागाच्या बैठका घेऊन, तसेच शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फळपीक विमा मंजूर झाला आहे. 

पंधरा दिवसात खात्‍यात
येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम परस्पर विमा कंपनीकडून जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची रब्बी पीकपेरणी वेळेत होऊन खरिपामधील नुकसानभरपाई काढण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT