Well
Well  Well
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील भुजल पातळी अद्याप खोलच

देवीदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस (Rain) झाला आहे. मात्र जिल्ह्यातील नद्या, नाले अद्याप कोरडेच आहेत. यामुळे विहिरी व कूपनलिकेची (Well and borewell) पातळी अद्यापही खालावलेली आहे. जळगाव जिल्ह्यात हतनूर धरणाचे (Hatnur Dam) ४१ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे तापीला महापूर (Flood) आला होता. असे असले तरी गावाकडच्या तालुक्या-तालुक्यातील नद्या अद्यापही दुथडी वाहत नसल्याचे चित्र आहे. नाले कोरडे आहेत. पावसाचे पाणी गावागावांत मुरलेले नाही. त्यामुळे गावागावांतील विहिरी, कूपनलिका यांची पातळी (Ground water level lowered) खोलच आहे.

(jalgaon district well and borewell water level lowered)

भूजल सर्वेक्षण विभागातर्फे वर्षभरात जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबर या चार महिन्यांत भूजल सर्वेक्षण केले जाते. जिल्ह्यातील १७८ ठिकाणच्या विहिरींवर सर्वेक्षण केले जाते. त्यात पातळी किती उंचावली आहे किंवा घटली आहे, याची माहिती मिळते. भूजल सर्वेक्षण विभागातर्फे भूजल पातळी मोजण्यासाठी अद्याप दोन महिन्यांचा कालावधी असला तरी विविध गावांतील विहिरी, कूपनलिका यांचे सर्वेक्षण केले असता विहिरींच्या पातळीत तसेच बोरवेलच्या पातळीत वाढ झाली नाही.

१०८.८ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस सुरू असून, जिल्ह्यात आतापर्यंत १०८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कृषी आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७१९.७ मिलिमीटर आहे. तर जूनचे सरासरी पर्जन्यमान १२३.७ मिलिमीटर, जुलै १८९.२ मिलिमीटर, ऑगस्ट १९६.१ मिलिमीटर, तर सप्टेंबरचे सरासरी पर्जन्यमान १२३.६ मिलिमीटर असे संपूर्ण पावसाळा कालावधीचे सरासरी पर्जन्यमान ६३२.६ मिलिमीटर आहे. जुलैचे सरासरी पर्जन्यमान १८९.२ मिलिमीटर असून, या महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात १०८.८ मिलिमीटर म्हणजेच जुलैच्या सरासरीच्या ५७.५ टक्के इतका पाऊस पडला आहे.

जुलैतील तालुकानिहाय पाऊस

जळगाव- ९७.७ मिलिमीटर (४४.६ टक्के), भुसावळ- ६०.०० मिमी (३०.८), यावल- ७६ मिमी (३७.१), रावेर- १०७.८ मिमी (५८.९), मुक्ताईनगर- १०१.२ मिमी (५७.५), अमळनेर- ८७.४ मिमी (४६.६), चोपडा- ९०.५ मिमी (४२.३), एरंडोल- १६७.५ मिमी (८७.४), पारोळा- १३८.६ मिमी (७६), चाळीसगाव- १४४.७ मिमी (९१.८), जामनेर- ११३.१ मिमी, (५७.२), पाचोरा- ११५.३ मिमी (६४), भडगाव- ११५.८ मिमी (६६.९) धरणगाव- १२८.५ मिमी (५६.७), बोदवड- ८९.३ मिमी (४३.९) याप्रमाणे जिल्ह्यात एकूण १०८.८ मिमी म्हणजेच ५७.५ टक्के पाऊस झाला.


भूजल सर्वेक्षण विभागातर्फे पावसाळ्यानंतर सप्टेंबरमध्ये भूजल सर्वेक्षण केले जाते. यामुळे किती पाणीपातळी वाढली आहे, याबाबत आत्ताच सांगता येणार नाही. सप्टेंबरनंतर पातळीतील वाढीची माहिती मिळेल.

डॉ. अनुपमा पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT