Farm Road 
जळगाव

शेतातील सोन्याला चिखलाचे ग्रहण !

कापसाचा हंगाम १५ ते २० दिवसावर येऊन ठेपला आहे. संपूर्ण पाणंद रस्ता चिखलमय झाला असून, शेतात तयार झालेला माल घरी कसा आणावा.

किशोर पाटील

वावडेः 'शेत तिथे पांदण रस्ता' ही सरकारची (Government) घोषणा गेल्या दहा वर्षापासून कागदावरच राहिली असून, रस्त्याअभावी शेतातील (Farm) कापूस घरी आणावे कसे याचीच चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कापसाचा (Cotton) हंगाम १५ दिवसांवर आला असताना अजूनही शेत रस्त्यावर दोन ते तीन फूट चिखल असल्याने पांदण रस्त्याची (Road) योजना सरकारने गुंडाळली की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वावडे सहपरिसरात काळी कसदार जमीन आहे, यावर्षी पावसाळा समाधानकारक झाला तरी गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे.परिणामी सगळ्या शेतरस्त्यावर गुडघाभर चिखल साचला आहे. हा चिखल पाऊसाने आतापासून उघडीप दिली तरी किमान एक महिना सुकणारा नाही.त्यामुळे १५ दिवसावर आलेला सोयाबीनचा हंगाम धोक्यात आला आहे.कापूस काढणी झाल्यानंतर हे पीक घरात आणावे कसे,असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतमाल घरी आणण्याची समस्या..

वावडे ते लोण हा दोन कि.मी. चा जुना पाणंद रस्ता आहे. शेताचे पाणी या रस्त्यात येत असल्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. मागील कित्येक वर्षापासून शिवारातील जाणे- येणे करण्यासाठी तसेच शेतमाल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कापसाचा हंगाम १५ ते २० दिवसावर येऊन ठेपला आहे. संपूर्ण पाणंद रस्ता चिखलमय झाला असून, शेतात तयार झालेला माल घरी कसा आणावा,असा प्रश्न या परिसरातील शेतकर्‍यांना पडला आहे. या वर्षी तरी रस्ता होईल अशी आशा शेतकरी दरवर्षी करतात. पावसाळा निघून गेल्यावर या रस्त्याचा विसर पडतो. यावर्षी मात्र, झालेल्या अति पावसामुळे व रस्त्यात पाणी साचून राहत असल्यामुळे रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. हा पांदण रस्ता करून देऊन शेतकऱ्यांची कायम समस्या सोडवावी अशी मागणी वावडे सह शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकप्रतिनिधींच्या निधीचा वापर व्हावा

खासदार आमदार यांना मतदारसंघाच्या विकासकामासाठी स्थानिक विकास निधी देण्यात येतो. मात्र,या निधीचा वापर सभागृह बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. पांदण रस्ता आधी झाला असेल तरच स्थानिक विकास निधी खडीकरण्यासाठी वापरता येतो. हा प्राधान्यक्रम बदलण्याची गरज आहे. स्थानिक विकास निधीतून पाणंद रस्ते करण्यासाठी तरतूद होण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हास्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण रस्ते तयार करता येतात. जिल्ह्यात मात्र गेल्या पाच वर्षांपासून या योजनेलाच कात्री लावण्यात आली आहे लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT