Farmer 
जळगाव

‘त्यांना’ ३८ वर्षांनंतर मिळाली स्वमालकीची जमीन

‘त्यांना’ ३८ वर्षांनंतर मिळाली स्वमालकीची जमीन

शंकर भामेरे

पहूर (जळगाव) : ‘हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या काव्यपंक्तीची आठवण व्हावी, असे माणूसपण जपत येथील जाधव परिवाराने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. (jalgaon-farmer-got-their-own-land-after-38-years)

येथील आर. टी. लेले विद्यालयाचे निवृत्त लिपिक सुधाकर बोरसे (वय ८४) यांनी मुलीच्या लग्नासाठी १९८४ मध्ये जिवलग मित्र दगडू जाधव यांच्याकडे दहा हजार रुपयांना तीन एकर जमीन गहाण ठेवली. कालांतराने या व्यवहाराचा दोघांनाही विसर पडला. अचानक २०२१ मध्ये कोरोना काळात निवृत्त लिपिक सुधाकर बोरसे यांना जमीन गहाण ठेवल्याची आठवण झाली आणि त्यांनी हा विषय मुलगा डॉ. दिनेश बोरसे यांना सांगितला.

निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत

डॉ. दिनेश बोरसे यांनी या व्यवहाराची माहिती वडिलांचे मित्र (कै.) दगडू जाधव यांच्या मुलाला दिली. सरपंचपती शंकर जाधव यांना या व्यवहाराची माहिती दिली. त्यांनी या विषयासंदर्भात सुधाकर बोरसे यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. या व्यवहाराची श्री. जाधव यांनी सुधाकर बोरसे यांच्याशी चर्चा केली आणि कोणताही स्वार्थ न दाखविता सामाजिक कार्यकर्ते युवराज जाधव यांच्या माध्यमातून सुधाकर बोरसे यांची तीन एकर जमीन त्याच भावात त्यांना परत केली. आजच्या स्वार्थी जगात माणुसकीचा झरा जिवंत ठेवणाऱ्या शंकर जाधव यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT