जळगाव

सोबत कोणीच नसल्यामुळे खडसे झाले केविलवाणे- गिरीश महाजन  

कैलास शिंदे

जळगाव : भाजप पक्ष सोडल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र त्यांना वाटत होते तसे झाले नसून त्यांच्या सोबत कोणीच गेले नसल्याने ते हताश झाले आहे. किरकोळ कार्यर्त्यांसोबत फोटो काढून त्यांचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. असे टिकास्त्र माजी आमदार गिरीश महाजन यांनी खडसेंवर आज केले.

जामनेर मतदारसंघातील दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आला होता. त्यावर बोलतांना महाजन म्हणाले, अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. एकनाथ खडसे यांचा हा अत्यंत केविलवाणा प्रकार आहे. भाजपतून राष्ट्रवादीत गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या सोबत येतील असा त्यांचा दावा होता, परंतु आज एकनाथ खडसे यांच्या सोबत कोणीच पक्ष सोडून जात नसल्यामुळे आता ते ‘राष्ट्रवादी’ कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच बोलावून त्यांच्या गळ्यात पक्षाचे गमचे टाकून प्रवेश केल्याचे दाखविले जात आहे. जामनेर तालुक्यातील दोनशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. परंतु, आताही आपला दावा आहे, की आपला एकही कार्यकर्ता गेलेला नाही, त्यांच्यासोबत गेलेले कार्यकर्ते भाजपचे आहेत हे खडसे यांनी सिध्द करून दाखवावे, असे अवाहनही त्यांनी दिले आहे. आपल्यासोबत कोणीही आलेले नाही, म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दाखविण्यासाठी खडसे यांचा हा केविलवाणा प्रकार सुरू असल्याचा आरोपही महाजन यांनी केला आहे. 

मुक्ताईनगरचा विचार करा 
खडसे यांच्यावर टिका करताना ते म्हणाले, खडसे यांनी जामनेरचा मुळीच विचार करू नये. त्याची चितांही करू नये. त्यांनी सद्य:स्थितीत मुक्ताईनगरची चिंता करावी, कारण त्यांच्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील जनाधार पूर्णपणे कमी झाला आहे. त्याठिकाणी त्यांनी लक्ष द्यावे. 

खडसेंची प्रतिमा काढली 
भाजप कार्यालयातून काढण्यात आलेल्या प्रतिमेच्या वादाबाबत ते म्हणाले, खडसेंची प्रतिमा आम्ही त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्याच दिवशी काढली.. त्यांनतर कोणाचीही प्रतिमा काढण्याचा संबध येत नाही. मात्र सध्या दिवाळीनिमित्त कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात येत असल्याने सर्वच प्रतिमा आम्ही काढल्या आहेत. त्यामुळे (कै.)निखिल खडसे यांची प्रतिमा काढण्याचा संबध नाही. 


अर्णववर सुडाच्या भावनेने कारवाई 
अर्णव गोस्वामी यांच्यावरील कारवाईबाबत ते म्हणाले, राज्य शासन आता सुडाच्या भावनेने कारवाई करीत असल्याचे दिसत आहे. आमच्या विरुध्द कोणी बोलले तर त्यांच्याविरोधात आम्ही कारवाई करू हाच संदेश राज्य शासन देत आहे. पत्रकारांचीही गळचेपी आता राज्य शासनाने सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT