jalgaon roads
jalgaon roads esakal
जळगाव

जळगावात हेलिकॉप्टर सेवा आवश्‍यक; चिखलमय रस्त्यामुळे चालणेही अवघड

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील शिवाजीनगर पुलाच्या कामाची संथगती, त्यातच या भागातील रस्त्यांची अवकळा झाली आहे. सर्वत्र चिखलच चिखल झाला आहे. त्यामुळे वाहन तर सोडूनच द्या, पायी चालणेही अवघड झाले आहे. पावसाळ्यापुरती तरी या भागात हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याची गरज परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (Latest marathi news)

शिवाजीनगरच्या विकासकामांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांत या भागात कोणतेही काम झालेले नाही. रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या कामाबाबत अनेक वेळा नागरिकांनी मागणी केली. त्यासाठी महापालिकेवर मोर्चाही काढण्यात आला, तसेच आंदोलनेही करण्यात आली. मात्र पदाधिकारी व महापालिका प्रशासनाने काम करण्याकडे लक्ष दिले नाही.

रस्त्यांची अवस्था बिकट

शिवाजीनगरातील सर्वच भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. लाकूडपेठ ते शिवाजीनगरातील ख्रिचन स्मशानभूमीलगत रेल्वेपटरीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त करण्यात आलाच नाही. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलच चिखल झाला आहे.

हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याची स्थिती

पावसाळ्यात रस्त्याची अवस्था चिखलमय झाल्यामुळे आता या भागातून वाहनेही चालविता येत नसल्याने व पायी चालणेही अवघड झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर आता थेट हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने पावसाळ्यासाठी तरी या रस्त्यावर ही सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिक संतप्त भावनेने करीत आहे.

रस्ता दुरुस्ती का झाली नाही?

महापालिकेत तब्बल १७० कोटी रुपयांच्या निधीची कामे आहेत. त्यात या रस्त्याचा समावेश करून त्याचे काम करण्यात आले नाही, असा प्रश्‍नही या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. शिवाजीनगर भागातील नागरिक ‘कर’ भरतात आणि ‘मतदान’ ही करतात. मग महापालिका त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्‍नही नागरिक करीत आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास

शिवाजीनगरातील लाकूडपेठ भागातील रस्त्याची अवस्था बिकट आहे. याच भागात खुबचंद सागरमल विद्यालय आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठीही अत्यंत कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून ‘पायी चालवून दाखवा आणि बक्षीस मिळवा’, अशी स्पर्धा लावली तरी कोणीही तयार होणार नाही, अशी स्थिती या रस्त्याची आहे.

''शिवाजीनगरातील सर्वच भागातील रस्ते खराब झाले आहेत. दगडाचा कच टाकून रस्ता दुरुस्तीचे आश्‍वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. जर त्यांनी काम केले नाही तर आपण तीव्र आंदोलन करणार आहोत.'' - विजय बांदल, शाखाप्रमुख शिवसेना, शिवाजीनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT