crops after harvest Report the damage within 72 hours esakal
जळगाव

Jalgaon : काढणी पश्चात पिकांचे नुकसान 72 तासांत कळवा; जिल्हाधिकारी मित्तल यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : खरीप हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नैसर्गिक स्थानिक आपत्तीमुळे व काढणी पश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले.

‘प्रधानमंत्री पीकविमा योजना-२०२२-२३’ खरीप हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी एआयसी विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत काढणी पश्चात नुकसान या बाबीकरिता ज्या पिकांची कापणी/काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (१४ दिवस) अतिपावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून व निकषांचे अधीन राहून नुकसानभरपाई निश्चित केली जाते.(Report crop damage within 72 hours after harvest Collector Mittal appeal Jalgaon News)

विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी आग किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यास या नैसर्गिक स्थानिक आपत्तीमुळे पीक नुकसानग्रस्त झाल्यामुळे अधिसूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात नेईल.

पीकविमाधारक शेतकऱ्यांचे अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीस टोल फ्री क्रमांकाद्वारे, मोबाईल अॅपद्वारे किंवा तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात/तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाइनद्वारे देणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

Pimpri Metro: मेट्रोचा पादचारी पूल अद्याप अपूर्णच; मोरवाडी चौकात संथगतीने काम, धोका पत्करून रस्ता ओलांडण्याची वेळ

Tata Motors: टाटा मोटर्सचा शेअर 40 टक्क्यांनी घसरला; शेअर बाजारात नेमकं काय घडलं?

Kolhapur Youth Accident : आयुष्याचा शेवट एका स्पीड ब्रेकरमुळे झाला, २४ सत्यजित बाबतीत घडलं विपरीत

Nashik Crime : भद्रकाली पोलिसांची मोठी कारवाई! १८ गुन्हे दाखल असलेल्या तडीपार सागर कुमावतला वणी गडावरून घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT