जळगाव : येत्या बुधवारपासून (ता. ३१) गणेशोत्सव सुरू होत आहे. दोन वर्षानंतरचा गणेशोत्सव पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होणार आहे. गर्दीद्वारे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अनेकांना संसर्ग होवू शकतो, यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करून स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी डीन डॉ. किशोर इंगोले यांनी दिली. (Risk of Corona infection in Ganeshotsav 2022 Alert alert of health department jalgaon Latest Marathi News)
सध्या कोरोनाच्या शंभर ते सव्वाशे चाचण्या दररोज होत आहे. त्यातीन दोन-तीन रूग्ण रोज पॉझिटिव्ह येत आहे. मात्र त्यांना ऑक्सिजनची गरज नाही. रुग्णालयात दाखल होऊन दोन-तीन दिवसात ते उपचार घेऊन बरे होत आहेत. पुणे, मुंबईत रुग्ण वाढत आहेत. काहीजण पुणे, मुंबईत गणेश फेस्टिव्हल पाहण्यासाठी जातील. जर नागरिक बाधितांच्या संपर्कात आले तरी त्यांना बाधा होवू शकते. यामुळे बाहेरगावी जातानाही मास्क घालणे गरजेचे आहे.
बेफिकीरपणा नको
‘कोरोना गेला आता काय मास्क घालायचा, अशी मनोवृत्ती योग्य नाही. इम्युनिटी पॉवर चांगली असेल तर कोणताही आजार होत नाही. मात्र इम्युनिटी पावर कमकुवत असेल तर साध्या आजाराचा रुग्ण जरी शेजारी असला तर त्याचा संसर्ग आपल्याला होवू शकतो. यामुळे मास्क घालणे, गर्दीत जाणे टाळणे ही काळाची गरज आहे.
ॲंटीजन चाचण्या झाल्या कमी
राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या कमी झाली. दुसरीकडे आरोग्य विभागाने अँटीजन, कोरोना टेस्टिंग चाचण्यांची संख्या कमी केली आहे. चाचण्या कमी झाल्याने रुग्ण संख्या बाहेर येत नाही, मात्र याचा उद्रेक केव्हा होईल हे सांगता येत नाही, असे खासगी डॉक्टरांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.