Watermelon
Watermelon esakal
जळगाव

टरबुजाला मातीमोल भाव; शेतकऱ्याने 2 एकर टरबुजांवर फिरवला नांगर

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : ‘सौदा करतात मालाचा, सारे मिळूनी व्यापारी... कष्ट केले किती अपार, पोटभर मिळेना हो भाकरी...’ या शाहीर नितीन रसाळ यांच्या ‘जगाचा पोशिंदा’ या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा पट्ट्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत येत आहे. वाढत्या उन्हाच्या दाहकतेमुळे टरबूजांचे प्रचंड नुकसान होत असताना बाजारात टरबुजांना कवडीमोल भाव मिळत आहे. टरबुजांच्या लागवडीवर झालेला खर्चही निघत नसल्याने टरबूज उत्पादकांच्या पदरी निराशा पडली आहे.

चाळीसगाव तालुक्यात यावर्षी सुमारे तीनशे हेक्टरवर टरबुजांची लागवड झाली आहे. सध्या वातावरणात उन्हाची तीव्रता कमालीची वाढत असल्याने मालाचे नुकसान होत आहे. पारंपरिक पिके सोडून बहुतांश शेतकऱ्यांनी टरबुजांची लागवड केली होती. लागवडीपासून योग्य काळजी घेत टरबुजांचे उत्पादन हाती आले. मात्र, बाजारात अक्षरशः कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शेतामधून बाजारात टरबूज विक्रीला आणल्यानंतर चक्क दोन रुपये किलोचा भाव व्यापाऱ्यांकडून मिळत असल्याचे वास्तव चित्र सध्या दिसत आहे.

लागवडीचा खर्चही निघेना

चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे, दरेगाव, लोंढे, उंबरखेडे, चिंचगव्हाण, दहिवद, पिलखोड, टाकळी प्र. दे., दसेगाव, तिरपोळेसह इतरही अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी टरबुजांची लागवड केली होती. जवळपास ३०० हेक्टरवर लागवड झालेल्या टरबुजांना भावच नसल्याने त्यांच्या तोडणीसाठी देखील शेतकरी धजावत नाहीत. तालुक्यात चार वर्षांपासूनच टरबुजांची लागवड वाढली असून या पिकाकडे नगदी पीक म्हणून शेतकरी पाहतात. मागीलवर्षी टरबुजांना चांगला भाव मिळाला होता. त्या अपेक्षेने यंदा अनेकांनी लागवड केली. मात्र, यंदा आवक प्रचंड झाल्याने भाव टरबुजांचे भाव कमालीचे गडगडले आहेत.

गल्लोगल्ली होतेय विक्री

व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात टरबुजांची खरेदी करीत असल्याने काहींनी तर हजारो रुपयांचे टरबूज अक्षरशः फेकून दिले आहेत. १५ ते १७ रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या टरबुजांना यंदा २ ते ३ रुपये किलोचा दर मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी तर खेड्यांसह शहरांमध्ये गल्लोगल्ली जाऊन स्वतःच टरबूज विक्री करण्याचा फंडा वापरला आहे. चाळीसगाव शहरात ट्रॅक्टरसह इतरही वाहनांमध्ये पाच ते दहा रुपये किलो दराने टरबूज विकले जात आहेत. काही शेतकरी १० ते ३० रुपये नगाप्रमाणे टरबुजांची विक्री करीत आहेत.

दोन एकर टरबुजांवर फिरवला नांगर

महाराष्ट्रातील टरबुजांना विशेषतः गुजरात राज्यात चांगली मागणी असते. या मागणीनुसार, रमजान महिन्यापर्यंत चांगला दर मिळाला. त्यानंतर मात्र भाव कमालीचे गडगडल्याने आणि वाढत्या उन्हामुळे टरबुजांना शेतातच भेगा पडून ते खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. काही शेतकऱ्यांच्या टरबुजांवर ‘व्हायरस’ही आल्याचे दिसून येत आहे. एकूणच हे सर्व होणारे नुकसान असह्य होत असल्याने दसेगाव (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी सागर राजपूत यांनी तर आपल्या दोन एकर क्षेत्रावरील टरबुजांवर नांगर फिरवला. टरबुजांवर केलेला सत्तर हजारांचा खर्च वाया गेल्याची खंत शेतकरी श्री. राजपूत यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT