Girna Dam esakal
जळगाव

गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला

गिरणा धरणात आज सायंकाळी सहाला ९२ टक्के पाणीसाठा झाला.

सकाळ वृत्तसेवा

भडगाव (जि. जळगाव) : गिरणा धरणात आज सायंकाळी सहाला ९२ टक्के पाणीसाठा झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने साठा वाढत असून काल दोन दरवाज्यातून अडीच हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. मात्र आज पुन्हा चार दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले. सायंकाळी सहाला ७ हजार १२८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (Latest Marathi News)

धरणाची सुरक्षितता पाहून दुपारी बाराला दोन गेटमधून २ हजार ४७६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. मात्र आज पुन्हा चार गेट उघडण्यात आले. त्यातून जवळपास ७ हजार १२८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठाच्या ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT