1000 and above corona patients found chiplun in ratnagiri 
कोकण

चिपळूणात कोरोनाग्रस्तांचा एक हजाराचा टप्पा पार ; या वयोगटातील व्यक्तींचा अधिक समावेश

मुझफ्फर खान

चिपळूण : चिपळूणात कोरोनाग्रस्तांनी एक हजाराचा टप्पा गाठला. जुने आजार आणि कोरोनाचे उशिरा निदान यामुळे चिपळूणात कोरोनाग्रस्त रूग्ण दगावत आहेत. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार घेतल्यास मृत्युदर कमी करता येईल. अशी माहिती कामथे उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सानप यांनी ‘सकाळ’ला दिली. रोजगार  किंवा व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणार्‍या 31 ते 40 वयोगटातील व्यक्ती करोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. 

चिपळूणात एकूण 1 हजार 6 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यातील 300 रूग्ण उपचार घेत आहेत. तर 676 रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहेत. 30 जणांचा मृत्यु झाला आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 67.20 टक्के असले तरी कोरोनाच्या विळख्यात सापडणार्‍यांमध्ये 31 ते 40 वर्षे वयोगटातील बाधितांची संख्या अधिक आहे. 51 ते 60 वयोगटातील बाधितांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यु दरात रत्नागिरीनंतर चिपळूण तालुक्याचा क्रमांक लागत आहे. 

नुकतेच अलोरेतील 30 वर्षीय कोरोनाग्रस्त तरूणाचे निधन झाले. यामुळे चाळीशीच्या आतील कोरोनाग्रस्तांचा मृत्यु होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कामथे उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सानप यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, ज्यांना बीपी, शुगर तसेच अन्य रोग आहेत. अशा रूग्णांची प्रतिकार शक्ती कमी असते. ते कोरोनाचे बळी ठरत आहेत.

सर्दी, खोकले, ताप आला तर लोक अंगावर काढत आहेत. मला काही होत नाही अशी समज करून घरच्या घरी घरगुती औषधे घेवून बरे होण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनही जे बरे होत नाही ते नंतर खासगी किंवा सरकारी रूग्णालयात उपचार घेतात. सुरवातीचा कोरोनाची लक्षणे कमी असताना उपचार घेतले तर आम्ही आठ ते दहा दिवसात रूग्णांना बरे करून घरी पाठवले आहेत. शेवटच्या स्टेजला जे रूग्णालयात दाखल होतात त्यांना वाचवताना मोठी कसरत करावी लागते.

"आम्ही मृत्यु दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कोरोनाची प्राथमीक लक्षणे दिसल्यानंतर नागरिकांनी तत्काळ तपासणी करून घेणे गरजेचे आहे. लोकांचा आणि शेजार्‍यांचा विचार न करता स्वतःच्या जीवाचा विचार केला पाहिजे. तेव्हाज आपण कोरोनावर मात करू शकतो."

- डॉ. अजय सानप, वैद्यकीय अधिकारी कामथे उपजिल्हा रूग्णालय

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 4TH T20I: भारतीय संघ जिंकत नसेल तर...! पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचं मोठं विधान; म्हणाला, हे खेळाडू..

IND vs ENG 4th T20I : करावं तरी काय? भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव अन् इंग्लंडने जिंकली मालिका; गौतम गंभीर हतबल

IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

Ashadhi Wari : आनंदोत्साहात पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये

IND vs ENG 4th T20I : पुन्हा तेच... वैभव सूर्यवंशी IPL समजून खेळायला गेला अन् जोफ्रा आर्चरने पुन्हा कार्यक्रम केला... Video

SCROLL FOR NEXT