286 primary schools are closed Decision to accommodate students in the nearest school in ratnagiri 
कोकण

कोकणात आता या शाळांचे गेट होईल कायमचे बंद..!

अशोक कदम

आरवली : रत्नागिरी जिल्ह्यातील ० ते ५ विद्यार्थी पटसंख्या असलेल्या २८६ प्राथमिक शाळा बंद करून त्यामधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण समिती बैठकीत घेण्यात आला. त्यामध्ये २७ उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी यावर्षीपासून होत आहे. तसे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी निशा वाघमोडे यांनी दिले आहेत.

 
नजीकच्या शाळेत समायोजन

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १३ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांचे नजीकच्या शाळांत विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला. नजीकच्या शाळेत समायोजन होत नसेल तर विद्यार्थ्यांना वाहतूक अनुदान देऊन त्यांना दुसऱ्या शाळेत समायोजित करावे, असा निर्णय झाला. 

शासनाच्या वित्त विभागानेही ३० जून व ८ ऑगस्ट २०१७ च्या पत्रातही अल्प उपस्थिती व आवश्‍यकता तपासून शाळा बंद करण्यात यावी. मुलांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करावे, असे सुचविले. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या गुरुवारी (ता. १०) झालेल्या बैठकीत ० ते ५ विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शाळा बंदची अशी आहेत कारणे

० ते ५ पटसंख्या असलेल्या शाळेत मुलांना सामाजिक व शैक्षणिक कौशल्ये संपादन होत नाहीत. मुलांचा सर्वांगीण व व्यक्तिमत्त्व विकास होत नाही. मुलांना सहशालेय उपक्रमात सहभागी होता येत नाही.मुलांच्या अध्ययन अध्यापनावर परिणाम होतो. मुले एकाकी, एकलकोंडी होतात. मुलांच्या मानसिक विकासात अडचणी येतात. कला, क्रीडा, कार्यानुभव, हस्तकला, स्पर्धा, विविध गुणदर्शन आदी कार्यक्रमांत विद्यार्थ्यांना वाव मिळत नाही. 

"० ते ५ पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय स्तुत्य आहे. या विद्यार्थ्यांचे समायोजन मोठ्या शाळेत झाल्यास त्यांचा गुणात्मक विकास होईल. शाळा टिकवण्यासाठी निकोप स्पर्धा होईल."

- विवेक कदम, शिक्षणप्रेमी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT