कोकण

ठेकेदार अडचणीत; 9 कोटी अडकले, कामही थांबले

सकाळ वृत्तसेवा

२०२०-२१च्या कामांना शासनाने अद्याप मंजुरी दिली नसल्याने जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे रखडली आहेत, अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या २५ -१५ योजनेअंतर्गत २०१९-२० मध्ये पूर्ण करण्यात आलेल्या १८३ कामांच्या सुमारे ९ कोटी निधीचे दायित्व शासनाकडे असल्याने ठेकेदार अडचणीत आले आहेत. २०२०-२१च्या कामांना शासनाने अद्याप मंजुरी दिली नसल्याने जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे रखडली आहेत, अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

शासनाच्या २५-१५ योजनेअंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत आदी बांधकामाची कामे केली जातात. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षाच्या कालावधीत ५८१ कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये कुडाळ २५६ कामे, देवगड ८६ कामे, मालवण १५० कामे, कणकवली २१, वैभववाडी १३, सावंतवाडी ४१,व दोडामार्ग तालुक्यातील १४ कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या ५८१ कामापैकी ४२९ कामांना प्रशासकीय मंजुरी देऊन त्यापैकी ३९९ कमाना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. पैकी आतापर्यंत ३५४ कामे पूर्ण झाली असून ३७ कामे अपूर्ण आहेत. ४९ कामे अद्याप सुरू झालेली नसून ५९ कामे तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आली आहेत.

चार वर्षांत कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या ३९९ कामापैकी ३५४ कामे पूर्ण झाली आहेत; मात्र यापैकी १८३ कामांचे सुमारे ९ कोटी रुपये निधी अद्याप शासनाकडे दायित्व आहे. दायित्व याचा अर्थ काम करायला आवश्यक परवानग्या दिल्या असल्या तरी निधी अद्याप संबंधीत विभागाकडे पोहोचलेला नाही. शासनाकडे ९ कोटी रुपयांचे दायित्व असल्याने पूर्ण झालेल्या १८३ कामांची बिले अद्याप ठेकेदारांना मिळालेली नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदार अडचणीत सापडले आहेत. याचा परिणाम सुरू असलेल्या कामांवर होत आहे.

‘बांधकाम’ म्हणते, कामे पूर्ण करू!

शासनाच्या २५-१५ योजनेअंतर्गत नवीन आर्थिक वर्षांतील २०२०-२१च्या कामांना अद्याप शासनाने मंजुरी दिलेली नाही. अर्धवट असलेल्या कामांना निधी नसल्याने ती कामे पूर्ण करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शासनाच्या २५-१५ योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून निधी प्राप्त होताच संबंधित कामाची बिले अदा केली जातील. तर अर्धवट राहिलेली कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

ग्रामीण भागातील रस्ते खड्ड्यात

गेली दोन वर्षे रस्ते कामांसाठी, विविध रस्ते विकास योजनांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. जिल्ह्यात सध्या गणेशोत्सव सुरू असून बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांची वाहने तसेच स्थानिक वाहनांची संख्या वाढल्याने जिल्ह्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. त्यातच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रस्ते ठीक-ठिकाणी चिखलाने माखले आहेत यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT