Aditya Thackeray सकाळ
कोकण

हे दीड-दोन महिन्याचं नाटक; केसरकरांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र कधीच गद्दारी खपवून घेत नाही. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ डिजिटल टीम

Aditya Thackeray Shivsena Sawand Yatra : राज्यात सध्या अतिशय घाणेरडे राजकारणं सुरू असून, सध्या राज्यात केवळ दोन लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे, असा घणाघात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात केला आहे. कुडाळ, सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग येथील शिवसंवाद यात्रेदरम्यान त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, महाराष्ट्र कधीच गद्दारी खपवून घेत नाही. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच राज्यातील हे नाट्य दीड ते दोन महिन्यांचं असून, हे गद्दार सरकार कोसळणारच आहे. येथील चिपी विमानतळाचा पाठपुरावा उद्धव ठाकरेंनी केला. मात्र, काही लोकं कामाचं श्रेय घेण्यासाठी पुढे आले मात्र, सर्वांना माहिती आहे की याचं काम कुणी केलं आहे.

सध्या राज्यात विकास कामांकडे कोणत्याच नेत्याचं लक्ष नसून, सत्तेतील सरकार केवळ आणि केवळ घाणेरडे राजकारण करण्यात व्यस्त आहे. उद्धव ठाकरे प्रत्येकाचे मुख्यमंत्री होते. हे सरकार बेईमान असून, हे तात्पुरतं बेईमान गद्दार सरकार लवकरच पडेल असे ते म्हणाले. करण्यात आलेली ही गद्दारी उद्धव ठाकरेंसोबत नव्हे तर, माणुसकीसोबत करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी राज्यपालांवरदेखील हल्लाबोल केला. सध्या राज्यात एकमेकांमध्ये भांडण लावण्याचे काम राज्यपाल करत असल्याचे ते म्हणाले.

कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कळत नाही

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असून, तो कधी होईल याची कुणालाच कल्पना नसून, राज्यात सध्या केवळ दोनचं लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ अस्तित्त्वात आहे. मात्र, यात नेमकं कोण मुख्यमंत्री आणि कोण उपमुख्यमंत्री हेच कळत नाहीये. प्रत्येक गोष्टीच्या परवानगीसाठी यांना दिल्लीला जावं लागतंय असा टोलादेखील त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी गद्दारी करण्यापूर्वी सर्व आमदार खुल्याने फिरत होते. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीच्यावेळी या सर्वांना एका बसमधून डांबून आणले गेले. त्यावेळी या सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चिंता होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT