अलिबाग : सावित्री पात्रातील गाळ काढणार
अलिबाग : सावित्री पात्रातील गाळ काढणार sakal
कोकण

अलिबाग : सावित्री पात्रातील गाळ काढणार- अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : महाड शहरात दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सावित्री नदीतील बेटे आणि गाळ काढण्याची प्रक्रिया जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने सुरू करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पूरपरिस्थितीवरील उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बुधवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली.

या वेळी सावित्री नदीवरील दादली आणि गांधारी नदीवरील पुलांची उंची वाढविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका शहरातील व्यावसायिक, दुकानदारांसह व्यापाऱ्यांना बसला होता. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने मदत देण्यात येत आहे. या नुकसानग्रस्तांना मदतीसह इतर योजनांचा लाभ देताना शॉप ॲक्ट परवान्याव्यतिरिक्त त्यांच्याकडील इतर व्यावसायिक पुरावे ग्राह्य धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप उपस्थित होते.

लिलाव प्रक्रिया अपूर्ण

मेरिटाईम बोर्डाने पाठवलेल्या सर्वे अहवालानुसार सावित्री नदीच्या पात्रात साधारण एक लाख ४३ हजार ब्रास वाळू साठा आहे. याची किंमत ३४ कोटी ९२ लाख रुपये आहे. लिलाव प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा गाळ अद्याप काढण्यात आला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT