narayan rane uddhav thackeray sakal
कोकण

कोकणातील चिपी विमानतळावरुन श्रेयवाद रंगणार; राणेंनी केली 'ही' घोषणा

शिवसेनेने देखील या विमानतळाचे उद्घाटन सात ऑक्टोबर रोजी करण्याची घोषणा केली आहे

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : सिंधुदुर्गमधील चिप्पी परूळे विमानतळावरून येत्या 9 ऑक्टोबरला विमानसेवा सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेच त्याचे उद्घाटन करतील, असे सांगतानात शिवसेनेने कोकणमध्ये कोणताच प्रकल्प आणला नाही. त्यांनी आता श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, अशी स्पष्टोक्ती सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली.

शिवसेनेने देखील या विमानतळाचे उद्घाटन सात ऑक्टोबर रोजी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप, राणे कुटुंब आणि शिवसेना असा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. सेनेने कोकणात‌ कोणता प्रकल्प पूर्ण केले, हे सांगा. त्यांचे कोणतेच खासदार कामाचे नाही. फक्त 'कलेक्शन मास्टर' आहेत. हा विमानतळ आम्ही तिथे आणला. त्याचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री हेच करतील. त्यांना (सेनेला) कुणी उद्घाटनाची परवानगी दिली आहे. विमानतळ हा केंद्राचा विषय आहे, असे राणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

गेली सात वर्षे हा विमानतळ बांधून तयार होता, पण वाहतुकीला खुला नव्हता. आता कुठे सिंधूदुर्ग-मुंबई आणि ठिकाणी विमानसेवा सुरू होणार आहे, असे सांगताना २०१४ पर्यंत विमानतळ बांधून पूर्ण केला. अन्य कुणी विमानतळ बांधला नाही. आता कुणी श्रेय घेऊ नये,असा इशारा राणे यांनी दिला आहे.

शिवसेना सुरू नाही; बंद करते

मुख्यमंत्र्यांना या उद्धाटनाला बोलावणार का, या प्रश्नावर त्यांना बोलावयची गरज वाटत नाही, असेही राणे म्हणाले. शिवसेनेत पुरामुळे नुकसान झाले. त्यावेळी त्यांनी मदत जाहीर केली. पण काय दिले? काहीच दिले नाही. कोकणात कोणता प्रकल्प त्यांनी पूर्ण केला? शिवसेना काही कामाची नाही. तिथे शिवसेनेने रोजगार आणला नाही, उद्योग धंदे बंद आहेत. काय त्यांनी आहे? शिवसेना सुरू करतच नाही, ते फक्त सगळे बंद करतात, अशी टीका त्यांनी केली.

विमानतळ ते शहर असा रस्ता पूर्ण करायचा होता, त्यासाठी राज्याने पैसा दिला नाही. त्याला ३५ कोटी रुपये लागणार आहेत. तो रस्ता आम्ही नितीन गडकरी यांच्याकडून पूर्ण करून घेऊ. केंद्रच हे काम पूर्ण करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीवर बंधने आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर नारायण यांनी घणाघाती टीका केली. हिंदूच्या सणांना का बंदी? त्यांच्या सभांना, कार्यक्रमांना का बंदी नाही? घरावर दगड मारायला पाठवतात, त्याला का नाही बंदी. मुख्यंंमंत्री बोलतात एक करतात एक. दुसऱ्याच्या घरावर दगड मारतात, त्यांचा ते सत्कार करतात. हे कोणत्या विचारसरणीचे मुख्यमंत्री आहेत, अशी टीका राणे यांनी केली.

मुख्यमंत्री हे तिसऱ्या लाटेची भीती दाखवतात. तिसरी लाट दाखवून यांना घरातच बसायचे आहे. इतर राज्यांमधे तिसरी लाट का नाही? फक्त महाराष्ट्रातच ही लाट आहे. एवढे करूनही दीड लाख लोक गेलीच ना. नर्स नाही, डॉक्टर नाही. काय अवस्था आहे वैद्यकीय व्यवस्थेची. त्यांनी या विषयावर बोलूच नये.

- नारायण राणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT