कोकण

कोकण - जलप्रलयात संपर्काचा दुवा ठरला सॅटेलाईट फोन

जोडीला जिल्ह्यात काही ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली.

- राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्ह्यात जलप्रलयाने होत्याचे नव्हते केले. (ratngiri flood) शेकडो वर्षांनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शहर आणि गावांमध्ये पाणी भरले. जोडीला जिल्ह्यात काही ठिकाणी दरडी कोसळून (landslide) मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. या नैसर्गिक आपत्तीत शहरे, गावांचा संपर्क तुटला, तेव्हा मदतीला आला तो सॅटेलाईट फोन (satelight phone) (इमर सेट) आणि पोलिस (police) दलाची बिनतारी संदेश यंत्रणा म्हणजे वॉकीटॉकी.

दरड कोसळण्याची पोचरेतील दुर्घटना असो, पुरात गेलेली शहरे, गावं असो, या ठिकाणी तीन दिवस मदतकार्य, संपर्काचा (communication) मुख्य दुवा या दोन यंत्रणा बनल्या. जेव्हा संपर्काचे सर्व पर्याय संपतात, तेव्हा उपग्रहाद्वारे संपर्क होणाऱ्या सॅटेलाईट फोनचा उपयोग होतो. संरक्षण विभागाच्या परवानगीने या फोनचा वापर केला जातो. त्याचा रिचार्जही महागडा आणि अर्ध्या लाखापर्यंतचा आहे. जिल्ह्यात २२, २३, २४ जुलैला आलेल्या जलप्रलयामध्ये प्रामुख्याने चिपळूण, खेड ही शहरे पाण्याखाली गेली. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली.

शहरे व गावांचा संपर्क तुटला. मदतकार्याला अनेक अडथळे येत होते. कोणाचा कोणाशी संपर्क होत नव्हता. पुरात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी प्रशासन, पोलिस, स्वयंसेवी संस्था, स्थानिक धावून आले. मात्र, या दरम्यान दरडी कोसळण्याचे दुसरे संकट आले ते पोसरे, पेढे येथील घरं मातीच्या ढिगाऱ्यात गाडली गेली. एकापाठोपाठ एक संकटात संपर्क होत नसल्याने मदतकार्यात मोठे अडथळे येत होते. तेव्हा जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला सॅटेलाइट फोन सुरू करण्याच्या सूचना केल्या. यावरून गाझियाबाद येथून फोन रिचार्ज केल्यावर चिपळूण, पोचरे आणि पेढे या आपद्ग्रस्त भागात जिल्हा प्रशासनाचा उपग्रहाद्वारे थेट संपर्क सुरू झाला.

जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी त्यामुळे कायम संपर्कात होते. घटनास्थळी यंत्रणा पोचून बचाव आणि मदतकार्य सुरू झाले. सुरवातीला पोलिस दलाच्या वॉकीटॉकीचाही मोठा फायदा झाला. नियंत्रण कक्षातून चिपळूण, पोचरे, पेढे, खेड या ठिकाणी पोलिस दलाच्या या बिनतारी संदेश यंत्रणेमुळे मोठी मदत झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग व अन्य अधिकारी तीन दिवस या यंत्रणेचा मदतीसाठी वापर करीत होते.

वादळावेळीही वापर

कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना शासनाकडून हे सॅटेलाईट फोन मिळाले आहेत. सुमारे पावणेदोन लाख रुपये या फोनची किंमत आहे. नैसर्गिक आपत्तीत जेव्हा संपर्काचे काहीच साधन नसते, तेव्हा थेट उपग्रहाद्वारे कनेक्ट होणारा हा फोन आहे. जिल्ह्यातील जलप्रलयावेळी या फोनचा जिल्हा प्रशासनाने दुसऱ्यांना वापर केला. तौक्ते वादळावेळीही या फोनचा वापर झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT