कोकण

'कोरोनासारखं भयानक संकट माझ्यावर ओढावलं, मी मात्र 'All Is Well'च राहिले'

सचिन माळी.

मंडणगड : कुठलेही संकट आल्यानंतर स्वतःलाच ऑल इज वेल (All is well) म्हणणाऱ्या सुप्रिया चाळके यांनी नकारात्मक विचारांना मनातून काढून टाकत डॉक्टर, नर्स यांचा सल्ला, उत्तम आहार, वाफ घेणे, काढा, भरपूर पाणी पिणे आणि विश्रांती या गोष्टींची चोख अंमलबजावणी करून सकारात्मक विचाराने कोरोनावर मात केली. त्यांचा अनुभव तालुक्यातील कोरोना बाधित व्यक्तींसाठी ऊर्जा देणारा ठरतो आहे. त्यांनी याबाबत सकाळशी अनुभव शेअर केला.

प्राथमिक शिक्षिका असणाऱ्या सुप्रिया चाळके यांनी 17 एप्रिल रोजी तब्ब्येत बरी नसल्याने कोरोना अँटीजन टेस्ट करून घेतली. घरातल्यांनी नको म्हणत असताना संकटापासून पळ काढण्यापेक्षा चार हात केलेले कधीही चांगले या विचाराने त्यांनी टेस्ट केली. टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. क्षणभर पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. पण त्यातून स्वतःला सावरले, विचार केला प्रॉब्लेम आहे तर त्यावर सोल्युशन पण आहे. ही लढाई जिंकायची असा निर्धार करून त्या घरी गेल्या. स्वतःला वेगळ्या खोलीमध्ये बंद करून घेतले, कारण घरी सृष्टी आणि विभा या दोन लहान मुली, पती स्वप्नील यांनाही सांभाळायचे होते. १४ दिवस कटाक्षाने हे सर्व नियम पाळले.

सर्वांत आधी संपर्कात आलेल्या व्यक्तींना सावध केले. पहिल्या दिवसापासून औषधे चालू केली. त्याचबरोबर उत्तम आहार, वाफ घेणे, काढा, भरपूर पाणी पिणे आणि विश्रांती या गोष्टीवर जाणीवपूर्वक लक्ष दिले. सुरुवातीचे आठ दिवस मात्र कठीण गेल्याचे त्यांनी सांगितले. कारण प्रत्येक दिवशी वेगळी लक्षणे. आधी ताप, अंगदुखी, सर्दी खोकला, मळमळ, श्वास घ्यायला त्रास, लूज मोशन, नाक गच्च होणे, तोंडाला चव नाही. अशावेळी त्यांनी डॉक्टर, जवळच्या व्यक्तींचा सल्ला घेतला, पण यावर प्रत्येकाचे वेगवेगळी मते आली. कोण म्हणे सिटी स्कॅन करावा लागेल, ब्लड टेस्ट, छातीचा एक्सरा, तर कोण म्हणे या सगळ्याची गरज नाही. कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नव्हते. तरीही शेवटी सगळ्या टेस्ट करून घेतल्या. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. माईल्ड इन्फेक्शन झाले होते. तरीही या काळात अनेक चांगले वाईट अनुभव त्यांना आले.

आजारपणात सर्वात मोलाचा वाटा पती स्वप्नील यांनी उचलला. त्यांनी कसलीच गैरसोय होऊ न देता आठ दिवस औषधं, सकस आहार, वाफ, काढा, या गोष्टींकडे लक्ष देऊन काळजी घेतली. त्याचबरोबर मुलींचीही तितकीच काळजी घेतली. ज्या जवळच्या लोकांकडून आपण योग्य मार्गदर्शन धीर मिळेल अशी अपेक्षा करतो त्यांचेच निगेटीव्ह विचार ऐकून धीर सुटायचा, आणि ज्यांच्याशी आपला फारसा संबंधही आला नाही असे लोक आठ दिवस मेसेज अथवा कॉल करून विचारपूस करत होते. धीर देत मदत सुद्धा केल्याचे चाळके म्हणाल्या.

निगेटीव्ह विचारांपासून स्वतःला दूर ठेवलं. सोशल मीडियापासून त्या काही दिवस दूर राहिल्या. यादरम्यान नर्स असणाऱ्या त्यांच्या शाळेतील वर्गमैत्रिणी वृषाली महामुनकर यांनी खूप धीर दिला. कधीही दिवसा, रात्री मेसेज, फोन करून होणारा त्रास किंवा लक्षणे सांगायच्या. त्यावर योग्य सल्ला आणि उपचार सांगून आठ दिवसांत रिकव्हर होशील असा विश्वास त्यांनी दिला. या बोलण्याने खूप धीर यायचा. आणि झालेही तसेच. आठ दिवसांनी ती सर्व लक्षणे बंद झाली आणि सुप्रिया चाळकेंनी कोरोनावर मात केली.

"कोरोनाची लक्षणे आढळली आणि लगेच उपचार सुरू केले तर कोरोना नक्कीच लवकर बरा होतो. त्याचबरोबर गरज आहे ती सकारात्मक विचारांची. शरीरातील विषाणूला घालवण्याचे काम औषधे करतातचं, पण मनातील भीती, वाईट विचार घालवण्यासाठी सकारात्मक विचार करणारे, धीर देणारे, आत्मविश्वास निर्माण करणारे डॉक्टर, मित्रमंडळी प्रत्येकाजवळ असणे खूप गरजेचे आहे."

- सुप्रिया चाळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT