महावितरण वाईबाजार 
कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात २१५ गावे काळोखात; पुराचा फटका

महावितरण कंपनीची खबरदारी

राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात हाहाकार माजवणारी पूरस्थिती अजूनही कायम आहे. पाण्याची पातळी अपेक्षेप्रमाणे कमी होताना दिसत नाही. चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर, रत्नागिरीमध्ये अजूनही ठिकठिकाणी पाणी भरलेले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले असून मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरणच्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील २१५ गावे यात प्रभावित झाली आहेत. १ हजार २२९ ट्रान्सफॉर्मर बंद आहेत. एकूण १ लाख ६५ हजार वीज ग्राहक अंधारात आहेत.

जिल्ह्यात मुसळधार पावासाने दाणादाण उडविली

ढगफुटीप्रमाणे पडणाऱ्या पावसाने चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर, लांजा आणि रत्नागिरीतील सोमेश्वर आदी भाग पाण्याखाली गेला. चिपळूणची परिस्थिती भयावह आहे. हजारो नागरिक घर, इमारती आदी ठिकाणी अडकून पडली आहेत. त्यांना अजून मदत मिळालेली नाही. काल उशिरा मदतकार्याला सुरवात झाली. त्यामुळे प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेबाबत प्रचंड नाराजी आहे. नागरिक जीव मुठीत घेऊन मदतीच्या प्रतीक्षेत आहेत; मात्र बचाव यंत्रणा अपेक्षित वेगाने त्यांच्यापर्यंत पोचत नाही. जिल्ह्यातील सामाजिक संस्था, मंडळे, काही तरुणांनी पुढाकार घेऊन मदत कार्यासाठी चिपळूण, खेड आदी ठिकाणी रवाना झाले आहेत. परिस्थिती अतिशय विदारक आणि भयानक आहे.

महावितरण कंपनीच्या ग्राहकांना पुराचा मोठ फटका.

पुरामुळे जिल्ह्यातील २१५ गावे प्रभावित झाली आहेत. महावितरणच्या मुख्य वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, विद्युत खांब आदी पाण्यात गेल्याने महावितरण कंपनीने दक्षता म्हणून या भागातील वीज पुरवठा खंडित केला आहे. ज्या ठिकाणी पाणी ओसरत आहे त्या ठिकाणी हळूहळू विद्युत पुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण ४४२ गावांपैकी २२७ गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरू झाला आहे. तर २१५ गावामधील विद्युत पुरवठा बंद आहे. एकूण ५५ उपकेंद्रांपैकी ४० केंद्र सुरू तर १५ बंद आहेत. २ हजार २१८ ट्रान्सफॉर्मरपैकी ९८९ सुरू आहेत. तर १ हजार २२९ बंद आहेत. महावितरणचे जिल्ह्यात ५ लाख ५४ हजार ९२१ वीज ग्राहक आहेत. त्यापैकी १ लाख ६५ हजार वीज ग्राहक अंधारात आहेत.

सुरक्षित विद्युत पुरवठा देण्याचा प्रयत्न

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. अशा परिस्थितीत वीज पुरवठा सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते तसेच अनेक वीजवाहिन्या पाण्यात बुडाल्या आहेत. यामुळे वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू ठेवणे अशक्य होते. जसजसे पाणी ओसरेल त्या त्या ठिकाणचा वीज पुरवठा सुरू करणे शक्य होईल. परंतु उंच भागात जाणाऱ्या वीजवाहिन्या खोल किंवा सखल भागातून येत असतील आणि तिथे पाणी असेल तर वाहिनी सुरू करण्यात येणार नाही. जास्तीत जास्त सुरक्षित पुरवठा करण्यावर आमचा भर आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि संयम बाळगावा, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Kolhapur : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाळूमामा मंदिर तीन मार्चपासून बंद राहणार

Maharashtra Railway Project : महाराष्ट्रात नवा रेल्वे प्रकल्प ! ५,४०० गावांना जोडणारा २३१ किलोमीटरचा रेल्वे मार्ग मंजूर

Paithan Accident: कालव्यातील तिघांचा लागेना ठावठिकाणा; चांगतपुरीजवळ रात्री कोसळली होती कार, शोधमोहीम सुरूच..

Latest Marathi News Live Update : नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीदरम्यान पत्रकारांवर अन्याय

Kolhapur MSEDCL : कृषिपंपांची बनावट वीज बिल थकबाकी शेतकऱ्यांच्या माथी; राज्य इरिगेशन फेडरेशनचा आरोप

SCROLL FOR NEXT