हर्णे : मच्छीमारांवर मासळी दुष्काळाचे संकट - संतोष कदम
हर्णे : मच्छीमारांवर मासळी दुष्काळाचे संकट - संतोष कदम  sakal media
कोकण

हर्णे : मच्छीमारांवर मासळी दुष्काळाचे संकट - संतोष कदम

सकाळ वृत्तसेवा

हर्णे : समुद्रात होणार प्रदूषण जर मच्छीमारांच्या सहकार्यानेच थांबवता आलं तर मच्छीमारांवर आता हळूहळू जे मासळी दुष्काळाचे संकट येऊ घातलं आहे. ते संकट लवकरच दूर होईल. असे नेटफिश संस्थेचे राज्य समन्वयक संतोष कदम यांनी सांगितले. नेटफिश- एमपीईडिए (वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार) ह्या संस्थेच्या वतीने दिनांक १२ नोव्हेंबर,२०२१ रोजी हर्णै बंदर येथे "स्वच्छता पखवाडा-२०२१" साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला हर्णै बंदर परिसरातील मच्छीमार संस्थांचे बहुसंख्य पदाधिकारी व बोटमालक उपस्थित होते. यावेळी नेटफिश संस्थेचे राज्य समन्वयक श्री. संतोष कदम ह्यांनी समुद्री प्रदूषण, त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना ह्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारताच्या किनारपट्टीवर सुमारे २,६९,००० मासेमारी बोटी कार्यरत आहेत. ह्या बोटींना मासेमारी करत असताना मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळ्यात येत असतो. हा कचरा जर किनाऱ्यावर आणला गेला तर समुद्री पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. श्री.कदम यांनी सागरी प्रदूषण टाळण्याचे तीन प्रकारे व्यवस्थापन कसे करता येईल हे देखील पटवून सांगितले.

प्रथम मासेमारी करताना तुटलेली जाळी व प्लास्टिक कचरा समुद्रात टाकला जाऊ नये, मासेमारी जाळ्यांना चिन्हांकित करणे ह्याविषयी जनजागृती करावी लागेल; दुसरे म्हणजेबायोडिग्रेडेबल मासेमारी जाळ्यांचा वापर केला तर समुद्री सस्तन प्राण्यांची अनावश्यक मासेमारी कमी करता येईल; आणि तिसरे म्हणजे समुद्रात टाकली गेलेली तूटकी जाळी व प्लास्टिक कचरा किनारी घेऊन येणे व तो रिसायकलिंग साठी देणे अश्याप्रकारे व्यवस्थापन करता येऊ शकते त्याकरिता मच्छीमारांचे बहुमोल सहकार्य असणे अत्यंत महत्वाचे ठरेल. असे कदम यांनी पटवून दिले.

स्वच्छता पखवाडा-२०२१ हा कार्यक्रम दोन टप्प्यात साजरा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मासेमारी भागधारकां मध्ये प्लास्टिक प्रदूषणाविषयी जनजागृती करणे व मासेमारी करत असताना जाळ्यात येणारा प्लास्टिक कचरा स्वच्छ करून समूद्रकिनारी आणण्यासाठी प्रवृत्त करणे. दुसऱ्या टप्प्यात मासेमारी बोटांनी आणलेला कचरा किनार्यावर आणून तो रिसायकलिंग साठी देणे. ह्या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमासाठी मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुसऱ्या टप्प्यात मासेमारी जाळ्यातील कचरा गोळा करण्यात येणार असून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येईल.

सदर कार्यक्रमाकरिता बाळकृष्ण पावसे - अध्यक्ष हर्णै बंदर मच्छिमार संघ, प्रकाश रघुवीर - उपाध्यक्ष हर्णै बंदर मच्छिमार संघ हर्णै, हरेश कुलाबकर चेअरमन ओंकार मच्छिमार सहकारी संस्था, भानुदास चोगले चेअरमन हरीओम मच्छिमार सहकारी संस्था, गोपीचंद चोगले - सचिव हर्णै बंदर मच्छिमार संघ, तसेच हर्णै बंदर मच्छिमार संघाचे सदस्य व इतर नौकामालक व मच्छीमार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT