hurricane distrory in dapoli harne ratnagiri 
कोकण

वादळानंतर : जंगली प्राणी गावात येण्याचा वाढला धोका अन्....

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजना मोठ्या प्रमाणात राबवली. आता बागांच्या पुनरुज्जीवन, पुनर्लागवडीसाठी याच योजनेचा आधार मिळावा. पूर्वी भूविकास बँकेची दीर्घ मुदतीची कर्ज योजना होती, म्हणजे उत्पन्न सुरू झाले की कर्ज परतफेड करण्यास सुरवात व्हायची, अशा प्रकारची योजना आखण्याची गरज महेश परांजपे यांनी व्यक्त केली

.
ज्यांनी भातशेती सोडून दिली आहे, त्यामुळे त्यांनी नव्याने भातशेती पुन्हा सुरू करावी, म्हणजे पडीक क्षेत्र लागवडीखाली येईल. ना नफा ना तोटा तत्त्वावर केली तरी चालेल. पण थोडेफार उत्पन्न मिळेल व धान्याची समस्या सुटेल. हंगामी पर्यायी पिके घेता येतील. कारली, तोंडली, भोपळा, दुधीभोपळा, चिबूड आदी भाजीपालाही करता येईल. आंबा, काजू, फणस, कोकम, जायफळ यावर आधारित गृहोद्योग संपला आहे. त्यामुळे पर्यायी उत्पन्न म्हणून अन्य पिकांकडे पाहिले पाहिजे. हळद, काळीमिरीचे उत्पादन घेता येईल. त्याकरिता कृषी विद्यापीठाने मार्गदर्शन करावे, असे मत महेश परांजपे यांनी व्यक्त केले.

बागा पुनरुज्जीवनासाठी हवे बिनव्याजी कर्ज...
साग, फणस, शिवण, ऐन, किंजळ, जंगली झाडे पडली असून त्यापासून लाकडी साहित्य तयार करता येईल. ते उद्योजकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. किमान यातून थोडे उत्पन्न, तोडकामाचा खर्च भागेल. यासाठी शासनाने नियमात शिथिलता आणावी व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा परांजपे यांनी व्यक्त केली.


श्‍वापदे वस्तीत येण्याचा धोका

डोंगर, माळरान उजाड झाल्याने वानर, माकडे, जंगली श्‍वापदांचा आसरा गेला आहे. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात व निवार्‍यासाठी हे प्राणी गावात येण्याचा धोका विसरून चालणार नाही. त्याकरिता ग्रामस्थांनी सज्ज राहिले पाहिजे, अशी अपेक्षा परांजपे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT