कोकण

रत्नागिरीमध्ये वणव्यात काजू, आंबा कलमे मातीमोल

वाटदमध्ये ५०० आंबा कलमे होरपळली; माभळेत १० एकरांतील कलमे जळाली

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : तालुक्यातील रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील(ratnagiri) वाटद खंडाळा येथील आंबाबागेला(mango farm) भीषण आग लागली. या आगीच्या तांडवामध्ये मोहोरलेली सुमारे ५०० कलमे होरपळली. सुक्या गवतामुळे आग झपाट्याने पसरली असून आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, माभळेत लागलेल्या वणव्यातही काजू, आंबा कलमे खाक झाली आहेत.जेएसडब्लू एनर्जीच्या फायरब्रिगेडने घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. वाटद-खंडाळा येथे शिक्षक कॉलनीसमोर असलेल्या आंबा बागेमध्ये ही घटना घडली. शुक्रवारी (ता. ३१ जानेवारी) दुपारी अचानक ही आग लागली. सुकलेल्या गवताला आग लागली आणि वाऱ्यामुळे काही क्षणात झपाट्याने आग पसरत तिने रौद्र रूप धारण केले. आग लागल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन ती विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र ती आटोक्यात येत नव्हती. (in ratnagiri ganpatipule route some mango and cashew trees are totaly burnt)

आगीने काही तासांमध्ये बागेतील सुमारे ५०० कलमे होरपळून गेली. दरम्यान, जेएसडब्लू एनर्जीच्या फायरब्रिगेडला आग लागल्याचे समजताच गाडी घटनास्थळी दाखल झाली. फायरमन अक्षय पवार, अभिजित पाटील, सुहास चव्हाण, रोहित डोडमणी यांनी अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. प्रशासनाने झालेल्या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी वाटद खंडाळा येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश रहाटे यांनी केली आहे.संगमेश्वरजवळच्या माभळे येथे लागलेल्या वणव्यामुळे दहा एकर क्षेत्रावरील आंबा काजू तसेच इतर झाडे जळून खाक झाली आहेत.

मोहोरलेल्या आंबा व काजू बागा वणव्यामुळे खाक झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माभळे येथील फणसाचे भाटले ते गवळवाडीपर्यंतच्या भागात वणवा लागला. या क्षेत्रातील काजू, आंबा तसेच इतर झाडे जळून खाक झाली. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने आग लावली. त्यामुळे आगीचा मोठा भडका उडून ती पूर्ण सड्यापर्यंत पसरली. वणवा लागला असल्याचे समजताच शेतकऱ्याने धाव घेऊन ती विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र वणवा क्षेत्र जास्त असल्याने दोन तास झाले तरी आग आटोक्यात येत नव्हती.शेतकऱ्यांनी सर्व बाजूने प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. दरवर्षी माभळे येथे आग लागते. यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT