Insurance Company Ignore on farmer Insurance kokan marathi news 
कोकण

विमा कंपनीची ही चूक पडली शेतकऱ्यांना भारी ; झाले कोटयावधींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधूुदूर्ग) : विमा कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस यामुळे नुकसान झालेले ५३७ शेतकरी अद्यापही ६१ लाख रुपयांच्या विमा नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने उन्हाळी हंगामात पीक विमा उतरविण्यास शेकऱ्यांकडून नकार दिला जात आहे.

खरीप हंगाममध्ये जिल्ह्यात ७६० शेतकऱ्यांनी २२१.३४ हेक्‍टर क्षेत्र विमा हप्ता भरून संरक्षित केले होते. दरम्यानच्या कालावधीत ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि ऑक्‍टोबरमधील अवकाळी पाऊस यामुळे जिल्ह्यात पीक विमा उतरविलेल्या ५३७ शेतकऱ्यांच्या ३९.९२ हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे हे कृषी विभागामार्फत केले होते. त्यांना या नुकसानीपोटी ६१ लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे; मात्र विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी सक्रिय नसल्याने बऱ्याच ठिकाणी शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

 ५३७ शेतकरी विम्याच्या रक्‍कमेपासून वंचित

नुकसान झाल्याने ही भरपाई विमा कंपनीकडून नोव्हेंबर २०१९ अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणे आवश्‍यक होते; मात्र विमा कंपनी आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी येथील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून देण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील ५३७ शेतकरी विम्याच्या रक्‍कमेपासून वंचित राहिले आहेत. विम्याची रक्कम देण्यास विमा कंपनी दुर्लक्ष करीत असून शासनाने त्याकडे लक्ष द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

विमा उतरविण्यास शेतकरी अनुत्सुक
शेतकऱ्यांकडून खरीप हंगामात शेतीचा विमा उतरविला होता; मात्र विमा कंपनीच्या दुर्लक्षामुळे ५३७ शेतकऱ्यांना नुकसानीचा विमा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे चालू उन्हाळी हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्सुकता दाखविलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT