कोकण

खचलेल्या आंबा घाटाचे दुखणे राहणार कायम

राजेश शेळके

रत्नागिरी - पश्‍चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा आणि अतिवृष्टीमध्ये खचलेल्या आंबा घाटाचे दुखणे कायम राहणार आहे. मिर्‍या - नागपूर चौपदरीकरणामध्ये हा मार्ग येत असल्याने त्याच्या स्वतंत्र दुरूस्ती प्रस्तावाला खो मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुरूस्तीसाठीचा 2 कोटी 80 लाखाचा प्रस्ताव तयार केला आहे. दोन महिन्यात चौपदरीकरणाची निविदा निघणार आहे. मात्र घाटातील हा धोका कायम राहणार असल्याची चिन्हे आहेत.

मुसळधार पावसामुळे आंबा घाटात भेगा पडल्या असून भूस्खलनाची भिती होती. या मार्गावरील वाहतूक एक दिवस पूर्ण बंद होती. घाटातील पन्नास मीटरच्या भागात परिस्थिती गंभीर होती. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येणारा हा एकमेव मार्ग असल्याने भाजी, दूध, इंधनाची वाहतूक ठप्प झाली होती. शेकडो वाहने दोन्ही बाजूला उभी होती. या कोंडीतून रत्नागिरीकरांची सुटका करण्यासाठी घाटातून एकाच ट्रकवरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. तडे गेल्यानंतर पन्नास मीटरच्या भागात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर तो भाग पूर्णतः खचला.

बांधकाम विभागाकडून या भागाची तत्काळ दुरूस्ती करण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी खचलेल्या भागाच्या तळाशी संरक्षण भिंत बांधण्यात आली. मात्र अतिवृष्टीत तिही भिंत वाहून गेली. खचलेल्या भागाच्या दुरूस्तीवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले. दुरूस्तीचे काम करणे अवघड आणि खर्चीक बनले आहे.

बांधकाम विभागाने त्यासाठी सुमारे 2 कोटी 80 लाखाचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र मिर्‍या-नागपूर महामार्गाच्या कामात आंबा घाटात बोगदे आहेत. येत्या दोन महिन्यात या कामाची निविदा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा घाटाच्या खचलेल्या भागाच्या दुरूस्तीचे काम मागे पडले आहे. एकाच ट्रॅकवरून वाहतुक सुरू राहणार असल्याचे सध्याचे संकेत आहेत. त्यासाठी योग्यती खबरदारी म्हणून त्यांची 24 तास पोलिसांची गस्त, सूचना फलक, डेलेनेटर उभारण्यात आली आहेत.

आंबा घाटात खचलेल्या भागाच्या दुरूस्तीचा 2 कोटी 80 लाखाचा प्रस्ताव दिला आहे. रस्ता सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेली आहे. दुरूस्तीचे काम अवघड ठिकाणी आहे म्हणून सध्या 24 तास पोलिस गस्त आहे. अवजड वाहनांना बंदी आहे. गरजेप्रमाणे वाहने सोडली जात आहेत.
- एस. जी. शेख,

राष्ट्रीय महामार्ग विभाग अभियंता
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT