Loan waiver to 234 farmers in Ratnagiri district 
कोकण

रत्नागिरी जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना मिळाली कर्जमाफी 

सकाळ वृत्तसेवा

गुहागर : आज रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ 234 शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आहेत. कोकणातील आंबा, काजू, सुपारी बागायदार आणि मच्छीमारांसाठीही वेगळे निकष लावून लाभ मिळवून देण्याची आवश्‍यकता आहे. मात्र महाविकास आघाडीतील पक्षांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मजबूत विरोधी पक्षाचे कर्तव्य म्हणून सरकारला याचा जाब विचारण्यासाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलन केले, अशी माहिती भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी पत्रकारांना दिली. 

गुहागर तहसीलदार कार्यालयासमोर मंगळवारी (ता. 25) भाजप कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. तत्पूर्वी पक्ष कार्यालय ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्यासह तालुक्‍यातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. 

आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. नातू म्हणाले की, लांबलेल्या पावसाचा फटका शेतकऱ्यांप्रमाणेच बागायदारांनाही बसला आहे. सुपारीचे उत्पन्न घटले आहे. आंब्याच्या उत्पन्नातही घट होणार आहे. आज महसूल विभागाने सर्व्हे केला तर उत्पन्नातील घट लक्षात घेऊन भरपाईची रक्कम ठरविता येईल. मच्छीमारांचीही परिस्थिती वेगळी नाही. पाऊस लांबल्याने मच्छीचे उत्पन्न कमी झाले आहे. सामान्य मच्छीमारांसमोर पर्ससीननेट व एलईडीने होणाऱ्या मच्छीमारीने आव्हान उभे केले आहे.

बेकायदेशीर मच्छीमारीवरील कठोर कारवाईकडे राज्यसरकारचे दुर्लक्ष होत आहे. नव्याने स्थापन झालेले राज्यसरकार जनतेच्या उपयोगी योजना बंद करत आहे. याचा जाब विचारण्यासाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलन छेडले. प्रत्येक ठिकाणचे स्थानिक प्रश्न घ्यावेत असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र प्रदेशने निश्‍चित केलेल्या दोन मुद्‌द्‌यांवरच आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही नातू यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT