accident esakal
कोकण

मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; एकजण जागीच ठार

या अपघातात चारचाकी गाडीतील अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

या अपघातात चारचाकी गाडीतील अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत.

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास खेड येथे मुंबईकडे जात असताना एका कारचा भीषण अपघात झाला आहे. यात कारचालक किशोर अनंत चव्हाण (४८ धामापूर संगमेश्वर) यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात खेड तालुक्यात खवटी रेल्वेब्रिजजवळ आज पहाटे तीनच्या सुमारास झाला.

गाडीचा चालक किशोर वसंत चव्हाण (वय ४८, रा. धामापूर, ता. संगमेश्वर) यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांनी रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या आयशर गाडीला मागून धडक दिली. अपघातामध्ये चालक किशोर वसंत यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या अपघातात क्वालीस गाडीमधील अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत.

यामध्ये सनम चव्हाण (वय १२), हर्षदा चव्हाण (वय ४०), संतोष चव्हाण (वय ५५), रितिका चव्हाण (वय १६), सार्थक चव्हाण (वय १४), स्मिता चव्हाण (वय ५०), स्नेहा कर्वे (वय २८) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची बातमी कळताच कशेडी टॅब येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. यामध्ये श्री. बोडकर, समेल सुर्वे आदी पोलिसांचा समावेश होता. या सगळ्या जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कळंबणी खेड येथे उपचार सुरु आहेत. अपघातातील वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत चालू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT