कोकण

काँग्रेसचे पुतना मावशीचे प्रेम आम्हाला नको

सकाळवृत्तसेवा

कुडाळ - स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष असल्याने आमचा मित्रपक्ष नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसह सर्व निवडणुकांमध्ये जागांबाबत आपल्याशी चर्चा करावी. पुतना मावशीचे काँग्रेसचे प्रेम आता आम्हाला नको, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणीची बैठक जिल्हा कार्यालयात श्री. गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी नंदूशेठ घाटे, एम. के. गावडे, अमित सामंत, शिवाजी घोगळे, रंजन चिके, बाळ कन्याळकर, भास्कर परब, नम्रता कुबल, प्रफुल्ल सुद्रिक, डॉ. अभिनंदन मालडकर, एमडी सावंत, दिवाकर परब, रमण वाईरकर, प्रकाश गुरव, धर्माजी गावडे, संतोष गावडे, समीर आचरेकर, चंद्रकांत चव्हाण, बंटी कदम आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. गवस म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणूक पार्श्‍वभूमीवर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्ष म्हणून कार्यरत होते; मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचा विचार करता अजूनपर्यंत उमेदवारी निश्‍चित झालेली नाही. काँग्रेस पक्षाने कामापुरती आघाडी जोपासली. मित्रपक्षाला जवळ घेणे व नंतर पुतना मावशीसारखे प्रेम करणे, असे प्रेम आम्हाला नको. काँग्रेस पक्षाशी मैत्री केली तर मित्राने पक्षाचा गळा घोटू नये. भविष्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, विधानसभा या महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसह महत्त्वाच्या कमिटीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला योग्य सन्मान मिळाला पाहिजे. 
सिंधुदुर्गात प्रचार व मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम झाला असून ९५० पैकी ७० टक्के बूथ कमिट्या  झाल्या आहेत. उर्वरित ३० टक्के काम झपाट्याने सुरू आहे. तालुका शहर कार्यकारिणी झाल्यानंतर बूथ कमिटी जोरात सुरू आहे. पक्षाचे नेते अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा पक्ष सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये आहे. अद्याप कोणत्याही पक्षाबाबत निर्णय घेतलेला नाही. आम्हाला स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर माजी मंत्री भास्कर जाधव यांचा विचार करण्यात यावा, अशी आमची जिल्हा राष्ट्रवादीची मागणी आहे किंवा आघाडी करताना ज्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा पाहिजे असेल त्यांनी आमच्यासोबत बसले पाहिजे. दोघांमध्ये झालेल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर आमचा निर्णय वरिष्ठ पातळीवर कळवला जाईल. स्वाभिमान एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यामुळे आमचा मित्र पक्ष नाही.’’

यावेळी माजी बांधकाम सभापती तुकाराम बर्डे, रज्जाक पटवले, रंजना निर्मळ, दीपिका राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काजू दरासाठी आंदोलनाचा इशारा
जिल्ह्यातील काजूच्या दराबाबत श्री. गवस म्हणाले, की जिल्ह्यात काजूला १५० रुपये दर मिळाला पाहिजे. अन्यथा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनात्मक पवित्रा घेईल. रेशनवर तिन किलो तांदूळ, दोन किलो गहू मिळत होते ते आता तांदूळ दोन किलो, गहू तीन किलो झाले. रॉकेलसाठा फारच कमी असतो. याबाबतही आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT