कोकण

'ठाकरे सरकारसह मंत्र्यांना लपायला जागा मिळणार नाही'

मराठा शांत आहे याचा अर्थ असा नव्हे की तो सहनशील

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : ठाकरे सरकारने (State goverrnment) मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावे म्हणून कधी प्रयत्नच केले नाहीत, ना कधी या समाजाच्या पाठीशी उभे राहिले. याच ठाकरे सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी असे समजू नये की समाज शांत आहे, म्हणजे तो सहनशील आहे. जेव्हा उद्रेक होईल तेव्हा ठाकरे सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात लपायलाही जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. अशी तिखट प्रतिक्रिया भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे (nilesh rane) यांनी दिली आहे.

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने (suprime court) फेटाळून लावल्यानंतर राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे. यावर निलेश राणे म्हणाले की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटलं नाही. कारण ठाकरे सरकार असेपर्यंत आरक्षण (reservation) मिळणारच नव्हते आणि त्यांच्या मनातही नव्हते. अशोक चव्हाण जोपर्यंत या समितीवर आहेत तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही हे गेल्यावेळीच मी सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar)असोत किंवा शरद पवार (sharad pawar) असोत त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची ईच्छाच नव्हती. ते कधीही मराठ्यांच्या बाजूने बोलले नाहीत.

ठाकरे सरकारने आता मराठ्यांचा अंत पाहू नये. असंख्य मराठा तरुणांना (youth) रस्त्यावर आणण्याचं पाप ठाकरे सरकारने केलं आहे. तरुण त्यांना कधीच माफ करणार नाहीत. ते पुढे म्हणाले, मराठा समाज शांत आहे, याचा अर्थ असा नव्हे की, तो सहनशील आहे. जेव्हा उद्रेक होईल तेव्हा ठाकरे सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना लापायलाही जागा मिळणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढा, पण तरुणांच्या जीवाशी खेळू नका. जर ती आग त्यांच्या मस्तकात गेली आणि उद्रेक झाला तर त्याला ठाकरे सरकार जबाबदार असेल, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

थरारक प्रसंग! मृत्यूच्या दाढेतून परतले महसूल अधिकारी! माळशिरस महामार्गावर दोन तरुणांच्या धाडसामुळे वाचले प्राण, क्षणभर उशीर झाला असता तर...

Mumbai Mega Block : मुंबईत ब्लॉकमुळे उद्या १३ रेल्वेंवर परिणाम

Vidarbha Cold Wave: विदर्भात थंडीचा कडाका: नागपूर पारा ८.५ अंश, गोंदियेत ८ अंश सेल्सिअस

BMC Elections: देशातील हिंदू 1992 पुन्हा घडवण्यासाठी तयार... BMC निवडणुकीपूर्वी धीरेंद्र शास्त्रींचं मुंबईत वक्तव्य! राजकीय अर्थ काय?

SCROLL FOR NEXT