Arrest_
Arrest_ 
कोकण

गृहप्रकल्पाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यास अटक

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी : नवाथे कन्स्ट्रक्‍शनचा "युटोपिया' (मिनी लवासा) हा मोठा गृहप्रकल्प राबविण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले मुख्य संशयित सूत्रधार महेश गोविंद नवाथे (वय 45, रा. मारुती मंदिर) यांना आज आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईत अटक केली. त्याच्याविरुद्ध 340 तक्रारी असून त्यांनी 14 कोटी 28 लाख 38 हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये चौदा संचालक असून त्यापैकी चौघा संशयितांना अटक केली आहे.


नवाथे याने रत्नागिरीमध्ये धामणसे आणि निवंडी येथे युटोपिया म्हणजे मिनी लवासाचा प्रकल्प राबविण्याची घोषणा केली. विविध प्रसारमाध्यमांद्वारे त्याची जाहिरात केली. रत्नागिरीबरोबर देश आणि परदेशातूनही यामध्ये गुंतवणूक झाली. विविध सुविधा आणि परतफेडीचे आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवल्याने अनेकांनी प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक केली. परंतु, गुंतवणूक करणाऱ्या लोकांना चार वर्षे झाली तरी गुंतवलेली रक्कम परत मिळाली नाही किंवा प्रकल्प ठिकाणी कोणतेच काम सुरू झालेले आढळले नाही. गुंतवणूकदारांनी वारंवार त्याच्या कार्यालयाशी संपर्क साधला; मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. कंपनीचे मुख्य प्रवर्तक किंवा कर्मचारी हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे याची तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT