राजापूर (रत्नागिरी) : जिल्ह्यातील सर्वाधिक सातबारा संख्या असणाऱ्या राजापूर तालुक्याने सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम पूर्ण करण्यामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे शेतकऱ्यांसह तालुकावासीयांना आता लवकरच ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा कुठेही उपलब्ध होणार आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग असनाही प्रांताधिकारी प्रवीण खाडे आणि तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महसूल विभागाने नव्या वर्षाच्या आरंभाला साधलेल्या सुखद कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
तलाठ्यांशी न होणारा संपर्क, वारंवार डाऊन असलेला सर्व्हर आदी विविध कारणांमुळे सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयामध्ये वारंवार खेटे मारावे लागतात. ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाने 2013 पासून महसूल व वनविभाग अधिकारी अभिलेखातील नोंदी व त्यांच्या कार्यपद्धतीचे संगणकीकरण ई फेरफार कार्यकम संपूर्ण राज्यात हाती घेतला. सातबारा ऑनलाइन करण्याचे काम हाती घेण्यात आले. अनेक ऑनलाइन सातबारामध्ये अनेक त्रुटी राहिल्याने जमीन मालकांना असे चुकीचे सातबारे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे चुका सुधारण्यासाठी पुन्हा नव्याने सातबारा ऑनलाइनचे काम हाती घेतले.
237 गावे, 12 मंडल आणि 69 सजा
237 महसुली गावे आणि त्यामध्ये 12 मंडल आणि 69 सजांचा समावेश असलेल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक खातेदार आहेत. 3 लाख 18 हजार 949 सातबारा उताऱ्यांचे शंभर टक्के ऑनलाइनचे काम पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार वराळे यांनी दिली. सातबारा उतारा ऑनलाइन झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
दृष्टिक्षेपात राजापूरचे सातबारा उतारे
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.