pre monsoon rain in ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात एकाचवेळी दोन चक्रीवादळे तयार झाली असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर जाणवत आहे. सायंकाळी खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरीत वेगवान वार्‍यासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे काहीकाळ हवेत गारवा निर्माण झाला होता.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत होता. त्यामुळे निर्माण झालेल्या दोनपैकी एक चक्रीवादळ आफ्रिका खंडाच्या दिशेने पुढे गेले असून ते ओमेनकडे सरकणार आहे. दुसर्‍या चक्रीवादळाचा परिणाम भारतीय किनारपट्टीवर होण्याची शक्यता होती. ते चक्रीवादळ भारतीय किनार्‍यापासून जवळ असून त्याचा प्रभाव 3 जूनपर्यंत राहील असा अंदाज आहे. सध्याची त्या वादळाची दिशा गुजरातच्या दिशेने आहे. 

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. गेले चार दिवस हवेत प्रचंड उष्मा होता. पारा 36 अंशावर चढला होता. त्यामुळे पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला जाता होता. रविवारी दिवसभर ढगाळ वातारण होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर आणि परिसरात हलकासा पाऊस झाला. किनारपट्टी भागात वारेही वाहत होते. 

चिपळुणात दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर ढगांचा गडगडात सुरू झाला. दुपारी साडेतीन वाजता पावसाची रिपरिप सुरू झाली. हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे हवेतही गारवा निर्माण झाला. चार वाजेपर्यंत पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू होती. तालुक्यात काही ठिकाणी ढगांचा गडगडाट झाला. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेले नागरिक सुखावले. कोरोनामुळे त्रस्त झालेले संगमेश्‍वर तालुक्यातील नागरिक वाढत्या उष्म्याने हवालदिल झाले होते. रविवारी संध्याकाळी पडलेल्या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला. संगमेश्वर तालुक्यात एक तास मुसळधार पाऊस झाला. रविवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि चार वाजता ढगांचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या या पावसाने देवरूख बाजारपेठेत नागरिकांची व व्यापारी वर्गाची चांगलीच धावपळ उडाली. कोरोनाचा प्रभाव असूनही रविवारी देवरूख बाजारपेठेत गर्दी होती. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची गडबड उडाली. तेथील माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. संगमेश्‍वरात सुमारे एक तास पाऊस सुरू होता. टाळेबंदीत त्रस्त झालेल्या बालमित्रांनी पावसाचा मनमुराद आंनद घेतला. खेड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.

धूळ पेरण्यांना फायदा

संगमेश्वर तालुक्यासह जिल्ह्यात काही भागात शेतकर्‍यांनी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर भाताच्या पेरण्या उरकून घेतल्या आहेत. त्यांना या पावसाचा फायदा होणार आहे. टाळेबंदीत शेतकरी वर्ग शेतीच्या कामात गुंतला आहे. पावसामुळे वीजपुरवठा खंडित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT