Rajapur Farmer Not Submitted Bank Passbok In Banks Ratnagiri Marathi News 
कोकण

शेतकऱ्यांनो पासबुकाची झेरॉक्‍स दया नाहीतर.....

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : क्‍यार वादळामुळे झालेल्या अवकाळी पावसामध्ये भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून कमी मिळाल्याची बोंब शेतकऱ्यांकडून मारली जात आहे. मात्र, त्याचवेळी नुकसानभरपाईचे अनुदान बॅंक खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी सुमारे सातशे शेतकऱ्यांनी बॅंक पासबुकाची झेरॉक्‍स दिली नसल्याची बाब पुढे आली आहे. 

ऑक्‍टोंबर महिन्यामध्ये क्‍यार वादळ झाले. याचा फटका तालुक्‍यातील भातशेतीला बसून भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये तालुक्‍यातील 237 गावांमधील 1 हजार 854.52 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. त्याचा 9 हजार शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामध्ये 1 कोटी 89 लाख 60 हजार 900 रुपयांचे नुकसान झाले. याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागातर्फे शासनाला सादर करण्यात आला होता. 

हेही वाचा- रत्नागिरीत शिवसेनेची मतांना का लागली गळती...? 

शेतकऱ्यांची भरपाई त्यांच्या खात्यात 
त्याची दखल घेवून शासनातर्फे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. तालुक्‍याला 1 कोटी 89 लाख 60 हजार 900 रुपयांचे अनुदान प्राप्त झालेत. महसूल विभागातर्फे वितरण सुरू झाले आहे. मात्र, नुकसानग्रस्त सुमारे सातशे शेतकऱ्यांनी अद्यापही प्रशासनाकडे बॅंक खाते पासबुकाची झेरॉक्‍स जमा केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची भरपाई त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT